शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

घातक शस्त्रांचे घाव - सक्करदऱ्यात तिहेरी हत्याकांड

By admin | Updated: April 10, 2015 02:06 IST

पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

नागपूर : पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. नागरिकांनी आपापली दारे बंद करून घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडून असताना अवघ्या १०० मीटर अंतरावर उगले बंधूंच्या कुटुंबीयांना बराच वेळपर्यंत काहीही माहीत नव्हते. एकनाथचा भाचा पान सेंटरवर येत असताना त्याला संजय आणि केशवचे मृतदेह दिसले. त्यामुळे ओरडतच तो घरी गेला. वृद्ध आई आणि तिच्या तिन्ही सुना घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनाही कळविण्यात आले. माहिती कळताच सक्करदरा पोलीस पोहोचले. यावेळी एकनाथला धुगधुगी होती. त्याला एका वाहनात घालून मेडिकलला नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी एकनाथलाही मृत घोषित केले. परिसरच नव्हे, पोलिसही हादरलेया तिहेरी हत्याकांडाने सक्करदरा, बिडीपेठ परिसरातील नागरिकच नव्हे तर पोलीस दलही हादरले. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर यांच्यापाठोपाठ पोलिसांचा मोठा ताफा आणि पोलीस आयुक्त के.के. पाठक तसेच सहआयुक्त अनुपकुमार सिंग हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीनंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. हे तिहेरी हत्याकांड गुन्हेगारांमधील उफाळलेल्या वादाचा परिणाम असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला. गुन्हेगारांमधील वैमनस्यावरून हे हत्याकांड घडल्याचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले. मात्र, हा टोळीयुद्धाचा प्रकार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)उगले परिवारात आक्रोशएकनाथ, संजय आणि केशव हे तिघेही भाऊ एकत्र राहात होते. एकनाथ सर्वात मोठा असला तरी सर्वात आधी लग्न संजयचे झाले होते. त्यामुळे त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकनाथला एक मुलगा आहे तर, केशवची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. तिला कोणत्याही दिवशी मूल होऊ शकते. त्यामुळे उगले परिवारात नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी होती. मात्र, हे आक्रित घडले. तीनही भाऊ एकाच वेळी निर्घृणपणे मारले गेल्यामुळे तिघांच्या पत्नी तसेच वृद्ध आईचा आक्रोश पाहवला जात नव्हता. मुले मात्र अबोध असल्यामुळे ती हा आक्रोश गप्पपणे बघत होती. त्यांना या भयावह घटनेची कल्पनाच नव्हती. उगले परिवाराचा आक्रोश परिसराला हलवून सोडणारा होता.