शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार

By admin | Updated: February 21, 2016 02:54 IST

राज्यातील गावागावांमध्ये पोलीस पाटील हे राज्य शासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असतात. निष्ठेने सेवा करीत असूनदेखील गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : पोलीस पाटलांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटननागपूर : राज्यातील गावागावांमध्ये पोलीस पाटील हे राज्य शासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असतात. निष्ठेने सेवा करीत असूनदेखील गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या सहाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर आ.सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, भाजपाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस पाटलांबाबत गावागावांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. पोलीस दलाचा विस्तार होत असतानादेखील पोलीस पाटलांचे महत्त्व कायम आहे व गृहखात्याचे अविभाज्य अंग आहे, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटलांच्या कामांचे कौतुक केले. गेल्या अनेक वर्षांमध्ये पोलीस पाटलांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यात आलेले नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मानधनवाढीचा आहे. मानधनासंदर्भात तत्काळ निर्णय झाला पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शिवाय पोलीस पाटलांच्या नियुक्तीमध्ये मुलाखतीला बाद करण्यात येईल व केवळ गुणवत्तेच्या आधारावरच निवड करण्यात येईल. याशिवाय पोलीस पाटलांच्या वारसांना जागा मिळावी यासाठी नियमांत काही तरतूद करता येते का याचा आढावा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस पाटलांना निवृत्तीनंतर काहीच मिळत नाही. त्यांच्यासाठी विधायक योजना सुरू करण्याबाबत आपण स्वत: पुढाकार घेऊ, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.भिकाजी पाटील, नियोजित अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, उपाध्यक्ष भृंगराज परशूरामकर, भिकूजी पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. श्रीकृष्ण पाटील यांनी आभार मानले. या अधिवेशनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पोलीस पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)वित्त विभागाला माणसांचा विचार नाहीपोलीस पाटलांच्या मानधनासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या कारभारावर टिप्पणी केली. पोलीस विभागात पर्याप्त कर्मचारी असल्यामुळे पोलीस पाटलांचे मानधन वाढविण्याची आवश्यकता नाही, असा शेरा वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी दिला होता. वित्त विभागाचे काम पैसे वाचविणे हे आहेच. माणूस कोण आहे, काय आहे याचा विचार ते करतच नाहीत. वित्त विभागातच पोलीस पाटलांच्या मानधनाची फाईल अडकली होती. परंतु आता या प्रस्तावासंदर्भात मी व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आम्ही दोघेही जबाबदारी घेतो. वेळ पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना समजेल अशाच भाषेत समजविण्याचीदेखील आमची तयारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.