शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

माेहपा नगरपालिकेला मुख्याधिकारी मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST

माेहपा : नगरपालिकेला तीन वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने कारभाराचा डाेलारा प्रभारी मुख्याधिकारी सांभाळत आहेत. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिका प्रशासनाने ...

माेहपा : नगरपालिकेला तीन वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने कारभाराचा डाेलारा प्रभारी मुख्याधिकारी सांभाळत आहेत. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिका प्रशासनाने पारित केलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीस विलंब व शहरातील विकास कामे प्रभावित हाेत आहेत.

पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिला नाही, शिवाय प्रशासनाच्या कामकाजाची गती मंदावली आहे. सभागृहात मंजूर केलेल्या ठरावांना वरिष्ठ कार्यालयाकडून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळविणे, त्याचा पाठपुरावा करणे, कामांचे नियाेजन करणे, नागरिकांच्या समस्या मार्गी लावणे, यासह अन्य महत्त्वाच्या बाबींना दीर्घ दिरंगाई हाेत आहे. शहरातील गळबर्डी भागातील काही कामे १० वर्षांपासून रखडली आहेत.

रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे, कविवर्य बन्साेड-गळबर्डी, आठवडी बाजार-बुधवारपेठ-माेठा पूल, महात्मा गांधी चाैक-म्हसेपठार, स्मशानभूमी या राेडच्या दुरुस्तीची कामे रेंगाळली आहेत. आठवडी बाजारातील ओट्यांचे बांधकाम, मटन मार्केटचा विस्तार, नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम, शहराच्या मध्य भागातून गेलेल्या मधुगंगा नदीची साफसफाई, दलित स्मशानभूमीचा रस्ता, हिंदू स्मशानभूमीचा विकास, मधुगंगा नदीवरील माेठ्या पुलाचे बांधकाम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, दलित व दलितेतर वस्त्यांमधील विकास रस्ते व नाल्यांचे बांधकाम थंडबस्त्यात आहेत.

शहराचा सिटी सर्व्हे करण्यात आला असून, मालमत्तांची सनद तयार झाली नाही. लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास याेजनेचे अनुदान मिळाले नाही. अशी अनेक कामे पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने रखडली आहेत.

---

साडेतीन वर्षात आठ प्रभारी

या पालिकेतील मुख्याधिकाऱ्याचा प्रभार २९ जून २०१७ पासून आजवर माेहपा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार आठ वेगवेगळ्या मुख्याधिकाऱ्यांकडे साेपविण्यात आला. कळमेश्वरच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्याकडे २५ जुलै २०१९ पासून या पालिकेचा प्रभार आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. कर्मचाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नसल्याने ते कार्यालयात वेळेवर हजर राहत नाही.

---

मंजूर प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी तसेच प्रत्येक विकास कामात सातत्य ठेवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पूर्णवेळ व अनुभवी मुख्याधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे.

- शाेभा कऊटकर,

नगराध्यक्ष, माेहपा.