शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

वूई वाँन्ट जस्टीस...

By admin | Updated: November 26, 2014 01:07 IST

काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे,

बालकांची मानवी शृंखला : पंतप्रधानांना पाठविले १.१० लाख पत्र
नागपूर : काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून उपराजधानीतील ५० शाळांमधील हजारो बालकांनी आज ‘वुई वॉंट जस्टीस’चा सूर काढून वर्धा मार्ग दणाणून टाकला.
आठ वर्षाच्या युग चांडक याचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेच्या तीन वर्षापूर्वी कुश कटारिया या आठ वर्षाच्या बालकाचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे बालकांच्या होत असलेल्या हत्येबाबत त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी सेंटर पॉईंट ग्रुप आॅफ स्कूल्स आणि युग फाऊंडेशनच्यावतीने आज लोकमत चौक ते पंचशील चौकादरम्यान मानवी शृंखला तयार करण्यात आली. यानिमित्त ‘युग की पुकार’ या संकल्पनेवर ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्र साकारले. आंदोलनात १८ वर्षाखालील मुलांवर होणाऱ्या दुष्कृत्यांसाठी एका विशेष न्यायालयाचे गठन करून आरोपींना १०० दिवसाच्या आत कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘काय कृती कराल तुम्ही जेंव्हा युगच्या जागेवर असू आम्ही’, ‘परत नको वार एकदाच करा निर्धार’, ‘आधी कुश आता युग, काय होती दोघांची चूक’, ‘हर बेटाबेटी अपनी हे सुरक्षा इनकी करनी है’, ‘बचपन सुरक्षित होगा तो देश सुरक्षित होगा’ असे वाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन लक्ष वेधले.
यावेळी समीर मेघे, माजी मंत्री अनिस अहमद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, माजी आमदार यादवराव देवगडे यांनी आंदोलनात भेट दिली. यशस्वितेसाठी प्रकल्प समन्वयक संजय वलीवकर, अरुण देव उपाध्याय, मुक्ता चॅटर्जी, डॉ. मुकेश चांडक यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
युगच्या आईचे डोळे पाणावले
आंदोलनात युगचे वडील मुकेश चांडक आणि त्याची आई उपस्थित होती. युगच्या हत्येनंतर शहरातील हजारो बालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहून युगच्या आईचे डोळे पाणावले आणि तिला आपला हुंदका आवरता आला नाही. माझा युग तर गेला परंतु इतर मुलांची सुरक्षा वाढविण्याची गरज असल्याचे तिने यावेळी सांगितले.
दुसरा युग, कुश होऊ नये
हिवरीनगरच्या सेंट झेविअर्स स्कूलची विद्यार्थिनी दिव्या भाजीपाले हिने दुसऱ्यांना युग, कुशसारख्या घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजात शांतता प्रस्थापित करून बालकांना सुरक्षा देण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी तिने केली.