आषाढी एकादशीनिमित्त आज हजारो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. आषाढीला साधारणत: पाऊस कोसळतोच किंवा यावेळेपर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाला असतो. यंदा मात्र पावसाने दडी मारली आहे. डोळ्यात प्राण आणून बळीराजा पावसाची प्रतीक्षा करतो आहे. या दाम्पत्यानेही विठ्ठलाची पूजा करताना त्याला साकडेच घातले. बा विठ्ठला...आता पाव रे...पुरे झाले, आता पाऊस पडू दे!!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}