शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी धरली शेताची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST

कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण आणि मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. काही काेराेना प्रतिबंधक ...

कैलास निघाेट

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण आणि मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. काही काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत आहेत तर काही आजही बेजबाबदारपणेच वागत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी काहींनी सर्व जीवनावश्यक वस्तू व कुटुंबीयांना साेबत घेऊन शेताची वाट धरली. त्यांनी शेतात तंबू व झाेपडी तयार करून संसार थाटला आहे. काहींनी संसार थाटण्यासाठी चक्क ट्रॅक्टर व त्याच्या ट्राॅलीचा वापर केला आहे. याला सध्या सुरुवात झाली असून, आगामी काही दिवसात याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने विविध उपाययाेजना केल्या. मात्र, काही नागरिक वारंवार आवाहन व सूचना करूनही त्या उपाययाेजनांचे पालन करीत नाही. याचा फटका साटक (ता. पारशिवनी) गावाला बसला. गावात काेराेनाचे संक्रमण आणि मृत्यूदर वाढत असल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले. त्यातच राजू भुते व गुणवंत ढबाले, दाेघेही रा. साटक या शेतकऱ्यांनी स्वत:सह कुटुंबीयांना काेराेनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या साटक शिवारातील शेतात राहण्याचा निर्णय घेत शेताची वाट धरली. काेराेना संक्रमणामुळे साटक गावात असलेली पूर्वीची वर्दळ फार कमी झाली आहे.

हा संपूर्ण भाग आदिवासीबहुल असून, या भागातील बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यात राजू भुते व गुणवंत ढबाले यांचाही समावेश आहे. सध्या काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आराेग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. शहरातील हाॅस्पिटलमध्ये खाटा मिळत नाहीत. राजकीय नेते काही करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत काेराेनाची लागण झाली तर उपचारासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतात राहायला येण्याचा निर्णय घेतल्याचे या दाेन्ही शेतकऱ्यांनी सांगितले. असाच निर्णय इतर नागरिक घेत असल्याने गाव हळूहळू ओस पडायला सुरुवात झाली आहे.

राजू भुते त्यांच्या वृद्ध आई व इतर कुटुंबीयांसाेबत तर गुणवंत ढबाले त्यांची पत्नी, अदिती व आकांक्षा या दाेन मुलींसाेबत काही दिवसांपासून त्यांच्या शेतातच वास्तव्य करीत आहेत. दुसरीकडे, गावातील काही नागरिक आजही भामट्यासारखे गावभर विनाकारण फिरताना, कुठेही थुंकताना, गर्दी करताना दिसत आहेत. त्यांना वारंवार सूचना देऊनही ते साधा मास्क वापरण्याची तसदी घेत नाहीत.

...

ढगाळ वातावरणामुळे तारांबळ

या भागातील काही शिवाराची प्रत्यक्ष पाहणी केली असता, किमान चार ते पाच कुटुंबे शेतात झाेपडी किंवा तंबू तयार करून वास्तव्य करीत असल्याचे आढळून येते. या झाेपडी व तंबूंमध्ये विजेची काेणतीही सुविधा नाही. त्यामुळे काही कुटुंबे अख्खी रात्र अंधारात काढत आहेत. या भागात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, अधूनमधून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी काेसळत आहेत. वादळामुळे तंबूचे कापड उडून जात आहेत तर पावसामुळे धान्य व इतर साहित्य भिजत आहे. परंतु, गावाच्या तुलनेत शेतात सुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया राजू भुते, गुणवंत ढबाले यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

...

विलगीकरणाची समस्या

काेराेनामुळे शहरात राेजगारासाठी गेलेली मंडळी गावात परत आली आहे. त्यातच घराघरात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जाताे. मात्र, अनेकांची घरे जुन्या पद्धतीची असल्याने त्यांच्या घरात स्वतंत्र खाेल्या नसल्याने विलगीकरणात राहायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर उपस्थित हाेताे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन गावातील समाजभवन अथवा शाळेच्या इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करीत नाही. त्यामुळे काही रुग्ण इच्छा नसतानाही त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात येत आहेत. यातून काेराेनाचे संक्रमणही वाढत आहे.