शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 8:02 AM

शिवसेनेच्या मुलाखतींनी वाढविला भाजप इच्छुकांचा बीपी

जितेंद्र ढवळे

नागपूर : विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक मतदार संघावर भाजप आणि शिवसेनेने दावा केला आहे. युतीत या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला येणार असल्याने येथील इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले. मात्र शनिवारी पारंपारिक युतीत शिवसेनेकडे असलेल्या काटोल आणि रामटेक मतदारसंघासह जिल्ह्यातील बाराही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती शिवसेनेच्या वतीने मुंबईत घेण्यात आल्या. त्यामुळे युतीत जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या जागा शिवसेनेला जाणार आहेत, अशी विचारणा स्थानिक भाजप नेत्यांकडून केली जात आहे.

१५ दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे प्रदेश महामंत्री आ.अतुल भातखळकर यांनी काटोल आणि रामटेकची जागा भाजपच लढणार असल्याचे सांगत स्थानिक नेत्यांना आश्वस्त केले होते. २०१४ मध्ये ज्या मतदार संघातून भाजपचे उमेदवार निवडूण आले त्या जागा शिवसेनेला सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. २०१४ मध्ये काटोलमध्ये भाजपचे आशिष देशमुख तर रामटेकमध्ये डी.मल्लिकार्जुन रेड्डी विजयी झाले होते.

काटोलमध्ये आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने या जागेवर आता शिवसेनेने दावा केला आहे तर रामटेक सेनेचा पारंपारिक मतदार संघ असल्याने युतीत ही जागा भाजपला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका सेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे युती झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काटोल आणि रामटेकच्या जागेबाबत काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणूक निकाल (२०१४)काटोल मतदारसंघ आशिष देशमुख - भाजपा (७०,३४४)अनिल देशमुख -राष्ट्रवादी काँग्रेस (६४,७८७)राजेंद्र हरणे - शिवसेना (१३,६४९)राहुल देशमुख- शेकाप (९,५८९)रामटेक मतदारसंघ डी.मल्लिकार्जुन रेड्डी - भाजपा (५९,३४३)आशिष जयस्वाल - शिवसेना (४७,२६२)सुबोध मोहिते - काँग्रेस (३५,५४६)अमोल देशमुख - राष्ट्रवादी (९,१६२) 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस