शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात गाजणार विदर्भातील प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2022 08:00 IST

Nagpur News येत्या सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दिशेने यशस्वी प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देसत्ताधारी व विरोधी पक्ष सज्ज, विदर्भवासीयांनाही अपेक्षा

कमल शर्मा

नागपूर : येत्या सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दिशेने यशस्वी प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे. सत्तापक्ष असलेले भाजप विदर्भाबाबत संवेदनशील असल्याचे सांगत विदर्भाची झोळी भरली जाईल, असा दावा करीत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष सुद्धा अभ्यास करून सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सुद्धा उठण्याची शक्यता आहे.

 

विदर्भ विकास मंडळाचे अद्याप पुनरुज्जीवन नाही

संविधानाचे कलम ३७२-२ अंतर्गत विदर्भासह गठित वैधानिक विकास मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपला आहे.

- महाविकास आघाडीने अडीच वर्षांपूर्वी पुढाकार घेतला नाही. शिंदे-फडणवीस सरकारने आता पुनरुज्जीवनासाठी शिफारस केली आहे. परंतु अजूनही केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही.

 

बॅकलॉग अजूनही कायम

- वर्ष १९९४ मध्ये इंडिकेटर व बॅकलॉगची गणना केली होती. आता राज्य सरकारचा असा दावा आहे की, अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्येच बॅकलॉग शिल्लक आहे.

- विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खड़क्कार यांच्या मते, अमरावती विभागात सिंचनाचा १,०३,१३२ हेक्टरचे अनुशेष आहे. अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्हे प्रभावित आहेत.

- १९९४ मध्ये सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी १०० सिंचन प्रकल्पांपैकी केवळ ६७ भौतिकदृष्टीने पूर्ण आहेत. ३३ चे काम सुरू आहे.

- १९९४ ते २०२२ पर्यंत नवीन बॅकलॉग तयार झाला आहे. त्याच्या गणनेची कुठे चर्चाच नाही.

 

३१४ सिंचन प्रकल्प अपूर्ण

- ३१४ सिंचन प्रकल्पांचे काम अजूनही अपूर्ण आहे. ज्या ४४ सिंचन प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे त्यांना १० ते १५ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती.

- सिंचनासाठी पाइपलाइनने पाणी पोहोचवण्याच्या ३५ योजना (प्रकल्पही) थंडबस्त्यात आहेत.

- महाविदर्भ जनजागरणचे संयोजक नितीन रोंघे यांचे म्हणणे आहे की, २-३ वर्षात विदर्भातील ७० टक्के जमीन सिंचन योग्य करण्याचा दावा म्हणजे जनतेची थट्टा होय.

- दुरवस्थेतील मालगुजारी तलावांचा समावेश करून पूर्व विदर्भातील सिंचन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

महागड्या विजेमुळे उद्योगांचे पलायन

- विदर्भातील वीज उत्पादनाची क्षमता १७,०१० मेगावॉट आहे. मागणी केवळी १२०० मेगावॉट आहे.

- विदर्भात शेजारी राज्यांच्या तुलनेत वीज महाग आहे. त्यामुळे येथून उद्योगांचे पलायन होत आहे.

- आतापर्यंत ३६ पेक्षा अधिक उद्योगांचे पलायन झाले आहे.

रिफायनरीबाबत मौन

- विदर्भात पेट्रोकेमिकल रिफायनरीची व्यावहारिकता तपासण्यासाठी अद्याप पुढाकार सुद्धा घेण्यात आलेला नाही.

-महाराष्ट्रात येत असलेल्या रिफायनरीला तीन भागात विभाजित करून एक भाग विदर्भाला देण्याची घोषणा झाली. पण पुढाकार नाही.

- रिफायनरी आल्याने विदर्भाचा चेहरामोहरा बदलवून जाईल, असा वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांचा दावा आहे.

हे प्रश्न सुद्धा कायम आहेत

- नागपूर करारानुसार विदर्भाच्या खात्यात राज्याच्या एकूण २३ टक्के शासकीय नोकऱ्या अपेक्षित होत्या. परंतु विदर्भाची टक्केवारी जवळपास आठ टक्के इतकीच आहे.

- रस्ते विकासाचा आराखडा तयार करतानाच विदर्भावर अन्याय झाला आहे. विदर्भासाठी तुलनात्मकदृष्ट्या अतिशय कमी लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

- राज्याच्या नक्षल प्रभावित ३८ तालुक्यांपैकी ३७ तालुके विदर्भात आहेत. खनिज संपदेच्या बळावर विकास करून त्यावर नियंत्रण आणण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन