शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

बदलते रूप : मेळघाटातील बांबूपासून सव्वा लाख राख्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 9:32 PM

एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर मेळघाटला अनुदानाच्या खिचडीची गरज पडणार नाही, असा विश्वास संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी येथे झालेल्या मीट द प्रेसमध्ये व्यक्त केला.

ठळक मुद्देरोजगारातून सन्मानासाठी बांबू केंद्राचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर मेळघाटला अनुदानाच्या खिचडीची गरज पडणार नाही, असा विश्वास संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी येथे झालेल्या मीट द प्रेसमध्ये व्यक्त केला.देशपांडे म्हणाले, मेळघाटात ३१७ गावे आहेत. तीन लाख लोकसंख्येमध्ये एक लाख ८० हजार तरुण आहेत. 

मेळघाटच्या या युवा सामर्थ्यांचा उपयोग सकारात्मक कार्यात झाला तर काय साध्य होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे बांबूपासून तयार झालेल्या राख्या आहेत. मेळघाटात फक्त कुपोषणच नाही. येथे दरवर्षी सहा हजार बालके जन्मास येतात. पण कुपोषणाचे शिकार होणारे फक्त ४०० असतात. उर्वारित ५,४०० बालके याच वातावरणात जगतात, तेच अन्न खातात, तरीही सक्षमपणे जगतात हे देखील लक्षात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.रोजगारनिर्मितीसाठी बांबूपासून राख्या निर्मितीच्या  प्रयोगाबद्दल ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून या राख्या तयार होत आहेत. यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री प्रकल्पाच्या माध्यमातून मेळघाटच्या जंगलात पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमाने ४० देशात ही राखी पोहचली आहे. मागील वर्षी मेळघाटातील महिलांनी पंतप्रधानांच्या हातावर या राख्या बांधल्या होत्या.बांबू धोरण सकारात्मक करण्यात मेळघाटचा मोठा वाटा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. २०१७ मध्ये राज्य सरकारने बांबू धोरण तयार केले. १९२७ चा वनकायदा बदलला. त्याचा सकारात्मक परिणाम येथे दिसत आहे. मेळघाट आपले रूप बदलत असून, हागणदारीमुक्त गावासोबत बाथरूमयुक्त गाव ही संकल्पना चित्री या गावात साकारली आहे. आसाम, झारखंड या राज्यांसह पनवेल, किनवट, नागपूर या क्षेत्रातही कार्य सुरू झाले आहे. मेळघाटातील खामदा, किनीखेडा, कुंड, खोपमार, राक्षा ही पाच गावे सोलरयुक्त झाली आहेत. यामुळे मेळघाटची ओळख यापुढे सन्मानजनक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळघाटला कॉमन फॅसिलिटी सेंटरची नव्हे तर डिझाईन्स स्टुडिओंची जागोजागी गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय माहिती कार्यालयाचे अनिल गाडेकर, संपूर्ण बांबू केंद्राचे सचिव सतीश घाणेकर, चंदा कनोजे, अनिता सेलूकर उपस्थित होते.बांबू केंद्राने परिवर्तन घडविले : चंदा कनोजेआपल्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात बांबू केंद्राने परिवर्तन घडविल्याचे मनोगत चंदा कनोजे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आम्ही भीलाला समाजातील. मुलगी म्हणून जगताना समाजाची बंधने अनेक. तरीही दहावी नापास असतानाही केंद्राने सन्मानाचे काम दिले. आईवडिलांनी परवानगी दिली. आज संगणक चालविते, टॅलीचे काम करते, एवढेच नाही तर प्रकल्पाच्या कामासाठी विमान, रेल्वेने प्रवास करते. पंतप्रधानांच्या हातावर राखी बांधण्याचे सौभाग्यही आपणास मिळाले. आयुष्यातील हे परिवर्तन संपूर्ण बांबू केंद्रामुळे घडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MelghatमेळघाटRakhiराखीMediaमाध्यमे