शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘तिच्या’ लढ्याने सरकार नमले, १५०० एकर जंगलही वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 10:58 IST

मध्य प्रदेशातील पेटून उठलेल्या आदिवासींसाठी उजीयाराेबाई ठरल्या प्रेरणा

निशांत वानखेडे

नागपूर : अभियंते घडविणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या कॅम्पसमध्ये सुटाबुटातील पाहुण्यांमध्ये पारंपरिक आदिवासी वेशात पाेहोचलेल्या उजीयाराेबाई केवटीया. मध्य प्रदेशच्या दिंडाेरी जिल्ह्यातील समनापूर काेंडी गावातील रहिवासी. जंगलताेडीमुळे अन्न हिरावल्याने पेटून उठलेल्या आदिवासींचे नेतृत्व करणाऱ्या उजीयाराेबाई यांच्या धाडसामुळेच दिंडाेरी जिल्ह्यातील १५०० एकर जंगल आज शाबूत राहिले. याच जंगलात पारंपरिक मिलेट्सची बीजबँक’ तयार करणाऱ्या उजीयाराेबाईंना म्हणूनच मिलेट्सच्या राष्ट्रीय परिषदेत येण्याचा मान मिळाला.

पाहुणे आणि तरुण विद्यार्थी त्यांच्यासाेबत सेल्फी घेत असताना थाेडा वेळ काढून त्या ‘लाेकमत’शी बाेलत्या झाल्या. वर्ष २००० च्या आसपास जंगलमाफियांची नजर त्यांच्या गावातील जंगलावर पडली. साेबतीला जंगलावर अधिकार सांगणारे प्रशासनही हाेतेच. मग झाडांची कत्तल सुरू झाली. या वृक्षताेडीत आदिवासींचे खाद्य असलेली ४३ प्रकारची रानभाजी, १८ प्रकारचे कंदमुळे, १२ प्रकारचे मशरूम आणि ४२ प्रजातीचे रानफळे नष्ट झाली. वनवे लावले गेले. जंगलातील पाणी आटले, मुलाबाळांचे भाेजन संपले.

भरडधान्याचे महत्त्व सांगण्याकरिता आदिवासी क्षेत्रातील विनिता पोहचली न्यूयॉर्कमध्ये

राेजगार आणि अन्न हिरावल्याने भुकेमुळे या जिल्ह्यातील आदिवासी पेटून उठला. पहिला लढा उभारणारी उजीयाराेबाई यांची प्रेरणा मिळाली. गावातील लाेकांना एकत्र करून आवाज उचलणाऱ्या उजीयाराेबाईंचा आवाज आसपासच्या गावात पाेहोचला आणि लढा सुरू झाला. त्यामुळे सरकारला नमावे लागले. जंगलाला आग लागू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले. हळूहळू जंगल बहरले. जलस्त्राेत भरले, जमीन सुपीक झाली आणि या जिल्ह्यातील १५०० एकराचे जंगल पुन्हा हिरवेगार झाले.

मिलेट्सची ‘बीजबँक’ही बनविली

जंगलातील काेदाे-कुटकी, रागी, सावळ, सिकिया, सलार, ज्वार, बाजरा अशा पारंपरिक मिलेट्सचे महत्त्व उजीयाराेबाईंनी ओळखले. गावातील १० महिलांना घेऊन समूह तयार केला व या मिलेट्सची बीजबँक तयार केली. आज गावातील १०० वर महिला त्यांच्या समूहात आहेत. मात्र ‘न्यू सीड’च्या माध्यमातून त्यांचे कार्य दिंडाेरी जिल्ह्यातील ५२ गावांपर्यंत हे अभियान पाेहोचले व ५५०० च्यावर महिलांची संघटना उभी राहिली.

टॅग्स :Socialसामाजिकenvironmentपर्यावरणforestजंगलMadhya Pradeshमध्य प्रदेश