शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

नागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:11 PM

अवैध दारूविक्रीची तक्रार केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात दोन गटात हाणामारी झाली. यात चार लोक जखमी झाले. मंगळवारी रात्री कोतवालीतील भुतेश्वर नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकोतवालीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध दारूविक्रीची तक्रार केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात दोन गटात हाणामारी झाली. यात चार लोक जखमी झाले. मंगळवारी रात्री कोतवालीतील भुतेश्वर नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. हा वाद पांडे व ठाकूर कुटुंबांमधील आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पांडे पूर्वी दारूविक्री करायचा. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होते. नंतर त्याला मनपात सफाई कामगार म्हणून नोकरी लागली. पोलिसांचे म्हणणे आहे की, पांडेने दारूविक्री बंद केली होती. परंतु पांडेचे शेजारी शिवकुमार ठाकूर, लोकेश ठाकूर, सुजीत ऊर्फ मोनू ठाकूर आणि आशीष ठाकूर यांना पांडे दारूविक्री करीत असल्याचा संशय होता. असे सांगितले जाते की, ठाकूर यांनी याची पोलीस व अबकारी विभागात तक्रारही केली होती. कारवाई झाली नाही. उलट पांडे कुटुंबाला ठाकूर कुटुंबाने तक्रार केल्याचे माहीत झाले. यावरून वाद वाढला.मंगळवारी रात्री वाद झाला. मोहन पांडे व त्याचा मुलगा राहुल पांडे हे सुजीत ठाकूर व त्याचा भाऊ शिवकुमार यांना ‘तूू समाजात आमची बदनामी करीत असल्याचे म्हणत शिवीगाळ करू लागला. मोहन पांडेने वस्तऱ्याने वार करून ठाकूर बंधूंना जखमी केले. यानंतर शिवकुमार, लोकेश, सुजीत व आशीष ठाकूरनेही तलवार व काठीने मोहन पांडे व त्याच्या मुलाला जखमी केले. कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. ठाकू र कुटुंबांचे म्हणणे आहे की, पोलिसांच्या उपस्थितीत पांडे व त्याच्या मुलाने हल्ला केला. त्यांचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही. पोलिसांनीही अवैध दारू विक्री करीत असल्याची बाब नाकारली आहे. तेव्हा कोण खरे बोलत आहे, याची कसून चौकशी होण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर