शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

नागपुरात लॉकडाऊनच्या काळात १३ दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 8:24 PM

लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले.

ठळक मुद्देसात महिन्यात ३०३ अपघात : ४४ दुचाकीस्वारांचा मृत्यूमृतांमध्ये विना हेल्मेट चालकांची संख्या अधिक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले. विशेष म्हणजे, जानेवारी ते जुलै या काळात ३०३ अपघात झाले. त्यात ९१ प्राणांतिक अपघात झाले असून ४४ दुचाकीस्वारांचा समावेश होता. यातील बहुतांश चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे किंवा हेल्मेटचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले आहे.नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ९४० अपघात, ३४० मृत्यू व ९८१ व्यक्ती जखमी झाल्या. जिल्ह्यात एकूण २०५७ अपघात, ५७७ मृत्यू व २१६८ जखमी झाले. २०१९ मध्ये शहरात १००७ अपघातात २५० मृत्यू तर १०४२ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ८४३ अपघात, ३८४ मृत्यू व ९५० जखमी झाले. जिल्ह्यात एकूण १८५० अपघात, ६३४ मृत्यू व १९९२ जखमी झाले. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २०७ अपघात कमी झाले असले तरी शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी जानेवारी ते जुलै महिन्यात ३०३ अपघात झाले आहेत.मार्चमध्ये ५, एप्रिलमध्ये २ तर मेमध्ये ६ दुचाकीस्वारांचा मृत्यूजानेवारी महिन्यात ७, फेब्रुवारी महिन्यात १४, मार्च महिन्यात ५, एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात ६, जून महिन्यात ६ तर जुलै महिन्यात ४ दुचाकीस्वारांचे प्राणांतिक अपघात झाले. यात लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात झालेल्या अपघातात १३ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला.वेगाने वाहन चालविणे हे अपघातांचे कारणवाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीसाठी निर्देशित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे किंवा रस्त्यावरील स्थिती न पाहता वेगाने वाहन चालविणे हे जवळपास १/३ जीवघेण्या अपघातांचे कारण असते. अतिवेगामुळे अपघात टाळण्यास कमी वेळ मिळतो, अपघाताची शक्यता वाढते व अपघात झाल्यास त्याची तीव्रताही वाढते. यातच हेल्मेट न घालता किंवा बोगस कंपन्यांचे अयोग्य हेल्मेट घालून दुचाकी चालवित असताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता अधिक पटीने वाढते.अपघात निश्चितच टाळता येण्यासारखेमागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकारचे अपघात मिळून २६८ अपघात कमी झाले आहेत. जुलै २०१९ मध्ये १३५ प्राणांतिक अपघात झाले होते. त्या तुलनेत जुलै २०२० मध्ये ९१अपघात झाले आहेत. ४४ अपघात कमी झाले आहेत. परंतु अपघात मुक्त शहर करण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात.विक्रम साळी,पोलीस उपआयुक्त (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर