शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ही आमची वारसास्थळे, इतिहासाबाबत आपुलकी कुठेच ना आढळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 07:00 IST

heritage Nagpur News नागपुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र, जवळपास सर्वच्या सर्व स्थळे खंगल्या अवस्थेत आहेत.

ठळक मुद्देकृष्ण रुक्मिणी मंदिर परिसरगंजट्टी, मद्यपींचा रंगतो फडलव्ह बर्ड्सचे चाळे राजरोस चाले

प्रवीण खापरे - विशाल महाकाळकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जे आपला इतिहास विसरतात, त्यांना इतिहासच विसरतो, असे जे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. अगदी विदर्भ, महाराष्ट्र, भारत खूप दूरची गोष्ट, नागपुरातच याचा साक्षात्कार घेता येतो. नागपुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत आणि त्यातील अनेक स्थळांची प्रकरणे कोर्टात आहेत. त्यातील काहींची जबाबदारी केंद्र आणि राज्याच्या पुरातत्त्व विभागाने घेतली आहेत. मात्र, ती जबाबदारी खरेच पार पाडली जात आहे का, हा प्रश्न आहे. अनेकांची तर नोंदही नाही. जवळपास सर्वच्या सर्व स्थळे खंगल्या अवस्थेत आहेत. त्यांच्याबाबत ना शासकीय संस्थांना ना आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आपुलकी आहे.

खामला येथून सहकारनगर विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर विमानतळाच्याच अखत्यारित असलेल्या जंगलात साधारणत: ३०० वर्षे जुने क्रिष्ण रुक्मिणी मंदिर आहे. हा एक स्थापत्याशास्त्राचा उत्तम असा नमुना आहे. येथे नजिकच गोंड-भोसले राजवटीच्या काळातील विहीर, नहर आणि अंघोळीसाठीचे ऐतिहासिक स्नानगृह आहे. कालांतराने येथे उरला आहे तो केवळ सापळाच. सर्व वास्तूंना भगदाड पडले आहेत. मंदिराच्या आणि नहरच्या मागच्या भागात गंजट्टी आणि मद्यपींचा फड रंगलेला असतो. येथेच लव्ह बर्ड्सचे चाळेही सुरू असतात. कुणालाच कुणाचे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होते. पोलिसांची फेरी दुरूनच निदर्शनास येत असल्याने सगळे अलर्टही होत असतात. जणू काही सर्व व्यवस्थित आहे. याबाबत शासन-प्रशासनाकडून कुठेलच पाऊल उचलले गेले नाही, ही शोकांतिका आहे. आपल्या ऐतिहासिक स्थळ, वास्तूंबाबत असलेली ही उदासीनता अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.

 हा गांजा पोलिसांना का सापडत नाही

एकीकडे सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणावर आगडोंब उसळला आहे. मात्र, नागपुरात या वारसास्थळांकडे सहसा कुणाचे लक्ष जात नसल्याची संधी साधून अनेक गंजट्टी व मद्यपी सर्रास गांजाचा कश बनवताना व ओढताना आढळून येतात. एवढेच नव्हे तर उत्सुकतेपोटी या स्थळाला भेट देणाऱ्या इतिहासप्रेमींनाही ते यात सहभागी होण्याचे आवाहन करतात. या गोष्टींकडे सुरक्षा व्यवस्थेचे लक्ष का जात नाही, हा प्रश्न आहे.

 पुरातत्त्व विभाग कोण्या कामाचे

ऐतिहासिक स्थळांची निगा राखण्याचे व दुरुस्ती करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे असते. मात्र, शहरातील ही वारसास्थळे ढासळत चालली आहेत. याकडे या विभागांचे लक्ष नाही. तेव्हा हे विभाग कोण्या कामाचे, असा प्रश्न निर्माण होतो. संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा तर संबंधित अधिकारी कायम नॉट रिचेबल असतात, हे विशेष.

 दहाव्या वर्गात शिकणारे प्रज्वल ठाकरे, ओम काकडे व आर्यन आवळे हे विद्यार्थी यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आम्ही इथे खेळायला येतो आणि जातो. हे स्थळ नेमके कोणत्या काळातील आहे, हे आम्हास ठाऊक नाही. मात्र, परिसर रम्य वाटतो, असे ते सांगतात.

..........

टॅग्स :historyइतिहास