शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

'खुल्या जागेवर गुणवत्तेचा हक्क अबाधित राहिला पाहिजे'; सरकारने निर्णय रद्द करण्याची आठवलेंनी केली मागणी

By आनंद डेकाटे | Updated: May 18, 2026 19:02 IST

Nagpur : स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यापासून रोखण्याचा निर्णय गुरूवारी राज्य सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यापासून रोखण्याचा निर्णय गुरूवारी राज्य सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या निर्णयाला तीव्र विरोध करीत राज्य सरकारचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विरोधात असल्याचे स्पष्ट करीत राज्य सरकारने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असेही सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे सोमवारी नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना समांतर आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, आरक्षण धोरणानुसार, जर एखादा राखीव प्रवर्गातील उमेदवार स्वतःच्या गुणवत्तेवर खुल्या प्रवर्गातील गुणांइतकी कमाई करत असेल, तर त्याला खुल्या प्रवर्गातून निवडले जाणे हा त्याचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालांनुसार, गुणवत्ताधारक उमेदवार कोणत्याही प्रवर्गातील असला तरी तो खुल्या जागेसाठी पात्र असतो. तेव्हा सरकारचा हा निर्णय न्यायालयाच्या विरोधातील असून सरकारने तो रद्द करावा. यावेळी त्यांनी विदर्भातील समाजकल्याण विभागाचा आढावा घेतला. विदर्भात ॲट्रोसिटीचे प्रकरण कमी असल्याची माहिती देत याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती मिळावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अंबाझरी येथील आंबेडकर भवनाचे बांधकाम तातडीने सुरू करावे तसेच दीक्षाभूमीला लगतची कृषी विभागाची जागा मिळआवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

वर्गीकरणात लोकसंख्येनुसारच आरक्षण मिळावे

अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण होत असेल तर त्यातही लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळावे. सध्या जनगणना सुरू असल्याने जनगणनेनंतरच ते लागू करावे, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली.

जनगणनेत आपली मूळ जात नोंदवा

जनगणनेमध्ये जातीची नोंद करणे आवश्यक आहे. तेव्हा बौद्ध समाजाने धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यामध्ये आपली मूळ जात लिहावी, असे आवाहनही आठवले यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Reservation Based on Merit Should Remain; Athawale Demands Decision Reversal

Web Summary : Ramdas Athawale opposes the state government's decision restricting reserved category candidates from claiming open category seats based on merit. He argues it contradicts Supreme Court rulings and demands its revocation. He also requested starting Ambedkar Bhavan construction immediately.
टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर