शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील बदलासाठी कृती करा

By admin | Updated: November 24, 2014 01:20 IST

प्रत्येकाने कर्मप्रधान असायला हवे. कर्म करीत रहा, फळाची आशा करू नका. समाजात आमूलाग्र बदल घडवायचे असल्यास कृती करा. त्याला सकारात्मकतेची जोड द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथी

गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना
नागपूर : प्रत्येकाने कर्मप्रधान असायला हवे. कर्म करीत रहा, फळाची आशा करू नका. समाजात आमूलाग्र बदल घडवायचे असल्यास कृती करा. त्याला सकारात्मकतेची जोड द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांनी येथे केले.
‘सिकलसेल-थॅलेसेमिया’ रुग्णांना विशेष रक्तपुरवठा करण्यासाठी गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाऊंडेशनचा शुभारंभ रविवारी सायंकाळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री जुही चावला यांच्या हस्ते झाला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मिलिंद माने, आंतरभारती आश्रमचे संचालक डॉ. भाऊ झिटे, डॉ. मनीष मेहता, सकल जैन समाजाचे निखील कुसुमगर, थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी, देवंग बावाशी, लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीश वरभे व डॉ. वनश्री वरभे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. डांगरे म्हणाले, देवावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. परंतु ज्याचा आदर करता त्याला गुरु मानून आयुष्य जगा, असे म्हणत त्यांनी फाऊंडेशनच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जुही चावला यांनी तीन मित्रांची गोष्ट सांगून जीवनातील कार्याचे महत्त्व विषद केले. त्या म्हणाल्या, पैसा, संपत्ती या गोष्टी मृत्यूनंतर सोबत राहत नाही, परंतु त्यांचे कार्य सोबत राहते, म्हणून चांगले कार्य करा. गुरुदेव फाऊंडेशनशी मी जुळली आहे, आपणही यात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. आ. माने म्हणाले, सिकलसेल व थॅलेसेमियाच्याबाबत अजूनही जनजागृती नाही. यामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे. हा आजार होऊच नये यासाठी डॉक्टरांसोबतच प्रत्येक व्यक्तीने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.
उद्घाटनीय भाषण डॉ. वनश्री वरभे यांनी केले. डॉ. हरीश वरभे यांनी आपल्या प्रास्तविकात गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना करण्यामागची भूमिका विषद केली. सोबतच पॉवर पार्इंट प्रेझेन्टेशनच्या मदतीने सिकलसेल व थॅलेसेमिया आजाराची माहिती देऊन त्यावरील उपाययोजना व औषधोपचारावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. राजीव मोहता यांनी केले.
दरम्यान लोकमत चौक येथून ‘सिकलसेल-थॅलेसेमिया’ निर्मूलन रॅली काढण्यात आली. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी रॅलीत ३० विविध शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)