शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

सत्ताधाºयांना एकजुटीची ताकद दाखवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 02:42 IST

ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी पेन्शनरआहेत.

ठळक मुद्देअनिल किलोर यांचे प्रतिपादन : महासंमेलनात देशभरातील हजारो ईपीएस पेन्शनधारकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी पेन्शनरआहेत. त्यांची ही मागणी हक्काची आहे. १४ कोटी लोकांची संख्या ही कमी नाही. ही संख्या एखाद्या पक्षाला सत्तेत आणू शकते तर सत्तेत असणाºयांची सत्ता उलथवूही शकते. त्यामुळे सत्ताधाºयांनी आमची मागणी मान्य न केल्यास येत्या २०१९च्या निवडणुकीत आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. सत्ताधाºयांना आमच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी येथे दिला.जनमंच आणि निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रेशीमबाग मैदानवार महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात देशभरातील हजारो पेन्शनधारक सहभागी झाले होते. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. शरद पाटील व निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे, राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे, आर. यू. केराम, रमेश पाटील, आयटकचे मोहन शर्मा, भारतीय मजदूर संघाच्या नीता चोबे व्यासपीठावर होते.अ‍ॅड. अनिल किलोर म्हणाले, दिल्लीत आपला आवाज पोहोचवण्यासाठीच या मैदानावर हे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कारण या मैदानाला लागून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृती मंदिर आहे. जवळच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान आहे आणि आज या दोघांचीही केंद्रात किती ताकद आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या पेन्शनधारकांची एकजूट त्यांना दिसावी म्हणून हे संमेलन येथे भरवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केरळचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांनी दिल्लीवरून फोनवर मार्गदर्शन करीत मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्याचे आश्वासन दिले. प्रा. शरद पाटील, रमेश पाटील, प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचे आवाहन केले. देशभरात ही संघटना मजबूत करावी, असेही सांगितले. श्याम देशमुख यांनी प्रास्ताविक केले.२१ फेब्रुवारीला दिल्लीत भव्य आंदोलननिवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीच्या वतीने यानंतर २१ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.भामसं व आयटकचेही समर्थनईपीएस ९५ योजनेतील पेन्शनधारकांना ९ हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला आयटक आणि भारतीय मजदूर संघानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय मजदूर संघाच्या नीता चोबे या यावेळी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी या मागणीचे समर्थन करीत भामंस आपल्यासोबत नेहमीच राहील, असे आश्वासन देत या आंदोलनाचा परिणाम नक्कीच चांगला होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आयटकचे मोहन शर्मा यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करावे, असे आवाहन केले.सरकारने केला गुन्हाईपीएस पेन्शनधारकांचे सरकारकडे तब्बल २ लाख ७७ कोटी रुपये सरकारकडे जमा आहेत. यापैकी १ लाख कोटी रुपये सरकारने पब्लिक फंडमध्ये टाकले आहे. हा आमचाच पैसा आहे तो आम्ही मागत आहोत. पेन्शनचा पैसा असा दुसरीकडे वळता करता येत नाही, हा गुन्हा आहे. यासाठी सरकारविरुद्ध एफआयआर सुद्धा दाखल करता येऊ शकतो, असे निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यावेळी बोलताना म्हणाले. सरकारने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आम्ही देशभरातील १४ कोटी लोकांना एकजूट करू आणि निवडणुकीत ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.हे ठराव पारितया महासंमेलनात विविध ठराव पारित करण्यात आले. यात ईपीएस पेन्शनधारकांना किमान ९ हजार रुपये पेन्शन मिळावी. ३१ मे २०१७ रोजी ईपीएफओ ने काढलेला काळा जीआर रद्द करावा. दोन वर्ष पेन्शन लाभाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. डिजिटलायजेशनच्या नावावर पेन्शन भरणे रोखू नये आणि कोशिवायरी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा.