शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सत्ताधाºयांना एकजुटीची ताकद दाखवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 02:42 IST

ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी पेन्शनरआहेत.

ठळक मुद्देअनिल किलोर यांचे प्रतिपादन : महासंमेलनात देशभरातील हजारो ईपीएस पेन्शनधारकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी पेन्शनरआहेत. त्यांची ही मागणी हक्काची आहे. १४ कोटी लोकांची संख्या ही कमी नाही. ही संख्या एखाद्या पक्षाला सत्तेत आणू शकते तर सत्तेत असणाºयांची सत्ता उलथवूही शकते. त्यामुळे सत्ताधाºयांनी आमची मागणी मान्य न केल्यास येत्या २०१९च्या निवडणुकीत आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. सत्ताधाºयांना आमच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी येथे दिला.जनमंच आणि निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रेशीमबाग मैदानवार महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात देशभरातील हजारो पेन्शनधारक सहभागी झाले होते. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. शरद पाटील व निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे, राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे, आर. यू. केराम, रमेश पाटील, आयटकचे मोहन शर्मा, भारतीय मजदूर संघाच्या नीता चोबे व्यासपीठावर होते.अ‍ॅड. अनिल किलोर म्हणाले, दिल्लीत आपला आवाज पोहोचवण्यासाठीच या मैदानावर हे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कारण या मैदानाला लागून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृती मंदिर आहे. जवळच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान आहे आणि आज या दोघांचीही केंद्रात किती ताकद आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या पेन्शनधारकांची एकजूट त्यांना दिसावी म्हणून हे संमेलन येथे भरवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केरळचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांनी दिल्लीवरून फोनवर मार्गदर्शन करीत मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्याचे आश्वासन दिले. प्रा. शरद पाटील, रमेश पाटील, प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचे आवाहन केले. देशभरात ही संघटना मजबूत करावी, असेही सांगितले. श्याम देशमुख यांनी प्रास्ताविक केले.२१ फेब्रुवारीला दिल्लीत भव्य आंदोलननिवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीच्या वतीने यानंतर २१ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.भामसं व आयटकचेही समर्थनईपीएस ९५ योजनेतील पेन्शनधारकांना ९ हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला आयटक आणि भारतीय मजदूर संघानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय मजदूर संघाच्या नीता चोबे या यावेळी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी या मागणीचे समर्थन करीत भामंस आपल्यासोबत नेहमीच राहील, असे आश्वासन देत या आंदोलनाचा परिणाम नक्कीच चांगला होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आयटकचे मोहन शर्मा यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करावे, असे आवाहन केले.सरकारने केला गुन्हाईपीएस पेन्शनधारकांचे सरकारकडे तब्बल २ लाख ७७ कोटी रुपये सरकारकडे जमा आहेत. यापैकी १ लाख कोटी रुपये सरकारने पब्लिक फंडमध्ये टाकले आहे. हा आमचाच पैसा आहे तो आम्ही मागत आहोत. पेन्शनचा पैसा असा दुसरीकडे वळता करता येत नाही, हा गुन्हा आहे. यासाठी सरकारविरुद्ध एफआयआर सुद्धा दाखल करता येऊ शकतो, असे निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यावेळी बोलताना म्हणाले. सरकारने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आम्ही देशभरातील १४ कोटी लोकांना एकजूट करू आणि निवडणुकीत ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.हे ठराव पारितया महासंमेलनात विविध ठराव पारित करण्यात आले. यात ईपीएस पेन्शनधारकांना किमान ९ हजार रुपये पेन्शन मिळावी. ३१ मे २०१७ रोजी ईपीएफओ ने काढलेला काळा जीआर रद्द करावा. दोन वर्ष पेन्शन लाभाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. डिजिटलायजेशनच्या नावावर पेन्शन भरणे रोखू नये आणि कोशिवायरी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा.