शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांचे पुतळे धूळ आणि कचरा मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST

शहीद स्मारक येथे सिटिझन्स फोरमचे श्रमदान : ‘स्वच्छ नागपूर, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर ...

शहीद स्मारक येथे सिटिझन्स फोरमचे श्रमदान : ‘स्वच्छ नागपूर, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेचीच जबाबदारी नाही तर नागरिकांचेही ते कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून नागपूर सिटिझन्स फोरमने ‘स्वच्छ नागपूर, माझी जबाबदारी’ हे अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून शहरातील दुर्लक्षित पुतळ्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधले आहे. रविवारी फोरमच्या युवा सदस्यांनी मॉरिस कॉलेज टी पॉईंट चौकातील शहीद स्मारक येथील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून या अभियानाला सुरुवात केली. या अभियानांतर्गत नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले आहे.

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या नागपूर व विदर्भातील शहिदांचे सुंदर स्मारक नागपुरात साकारण्यात आले आहे. मात्र, मनपाचे दुर्लक्ष झाल्याने या स्मारकात कचरा आणि धूळ साचली होती. फोरमच्या सदस्यांनी सर्फ आणि स्वच्छ पाण्याने हा परिसर स्वच्छ करून पुतळ्यावर साचलेली धूळ साफ केली. शहिदांच्या पुतळ्यांवर माल्यार्पण केले. यावेळी स्वच्छता अभियान प्रमुख अभिजित सिंह चंदेल, अमित बांदूरकर, अभिजित झा, गजेंद्रसिंग लोहिया, प्रतीक बैरागी, वैभव शिंदे पाटील, अंकुर देशमुख, स्वप्निल पोहणे, गोपाल सिंग, ओम राजपूत, राहुल बैरागी, प्रवीण बैरागी व संकेत महल्ले आदी सदस्य उपस्थित होते.

....

महापौर व आयुक्तांना फोरमचे चॅलेंज

केवळ राजकारणासाठी पुतळ्यांचा वापर करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी पुतळ्यांच्या दुरावस्थेकडेही लक्ष द्यावे. महापौर व मनपा आयुक्तांनी शहरातील महापुरुषांचे पुतळे व स्मारकांच्या नियमित स्वच्छतेसाठी योजना आखून तातडीने अंमलबजावणी करावी. महापौर व आयुक्तांनी पुतळ्यांची स्वच्छता चॅलेंज म्हणून स्वीकारावे, असे आवाहन सिटिझन्स फोरमच्या स्वच्छता अभियानाचे प्रमुख अभिजित सिंह चंदेल यांनी केले आहे. मनपाने पुढाकार न घेतल्यास फोरम शहरातील सर्व पुतळे व स्मारकांच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे ते म्हणाले.

....

स्मारक व पुतळ्यांची देखभाल करावी

अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांना तडे गेले आहेत शिवाय अनेक ठिकाणी पुतळ्यांच्या चबुतऱ्यांची मनपाने तातडीने डागडुजी करण्याची गरज असल्याचे अमित बांदूरकर म्हटले आहे.