शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बालक व दारूची तस्करी रोखण्यासाठी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST

आरपीएफचे पाऊल : रेल्वेगाड्यांची होतेय कसून तपासणी नागपूर : रेल्वे मार्गाने अनेकदा लहान मुलांचे अपहरण होते. तसेच चंद्रपूर आणि ...

आरपीएफचे पाऊल : रेल्वेगाड्यांची होतेय कसून तपासणी

नागपूर : रेल्वे मार्गाने अनेकदा लहान मुलांचे अपहरण होते. तसेच चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पथक तयार केले असून हे पथक रेल्वेगाड्यात होणाऱ्या अवैध बाबींना आळा घालण्याचे काम करीत आहे.

रेल्वेत लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असून सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून ४५ जोडी रेल्वेगाड्या धावत आहेत. रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असताना गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने एका पथकाची नेमणुक केली आहे. हे पथक अपहरण केलेल्या बालकांवर लक्ष ठेवण्याचे काम करीत आहे. रेल्वे मार्गाने दारूची तस्करी करण्यात येते. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात या दोन्ही जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यात येते. त्यावरही रेल्वे सुरक्षा दलाने नेमणुक केलेले पथक लक्ष ठेवून आहे. रेल्वेगाड्यात अनेकदा आरोपी दारूच्या बॉटल्स पोती किंवा बॅगमध्ये ठेवून बाजूला बसतात. अखेरचा थांबा येईपर्यंत ते या दारूच्या बॅगवर आपला हक्क सांगत नाहीत. अशा वेळी आरपीएफचे जवान या बेवारस बॅग ताब्यात घेतात. प्रवासात पकडल्या गेल्यास हे आरोपी या बॅगवर आपला हक्क सांगत नाहीत. पकडल्या न गेल्यास अखेरच्या थांब्यावर ते ही बॅग खाली उतरवून घेतात. आरपीएफने गठित केलेल्या पथकात एक अधिकारी आणि सहा जवानांचा समावेश आहे. आरपीएफच्या पथकामुळे रेल्वेस्थानकावर बालकांचे अपहरण आणि दारूच्या तस्करीवर आळा बसणार असल्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

..................

आरपीएफचे पथक सज्ज

‘रेल्वे मार्गाने अनेकदा बालकांचे अपहरण करण्यात येते. तसेच दारूच्या तस्करीसाठीही रेल्वेचा वापर करण्यात येतो. यावर आळा घालण्यासाठी आरपीएफतर्फे पथकाची नेमणूक करण्यात आली असून यानंतर अशा घटनांवर अंकुश लागणार आहे.’

-आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

...............