शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या चार भागांत लवकरच निवारा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:07 IST

बांधकाम न करता भाड्याच्या जागेत केंद्र सुरू करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व ...

बांधकाम न करता भाड्याच्या जागेत केंद्र सुरू करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर भिक्षेकरी पुनर्वसन मोहीम राबविली जात आहे. यासाठी देशभरातील १० शहरांची निवड करण्यात आली असून यात नागपूरचा समावेश आहे. शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार भागांत लवकरच निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

नागपूर शहरात २०१९ व २०२० मध्ये भिक्षेकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ८८४ व १०७० असे एकूण १९५४ भिक्षेकरी व बेघर आढळून आले. भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शहर विकास कृती नियोजन आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्राथमिक स्तरावर ६० व्यक्तींना निवारागृहाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्यात येईल. यात ३० पुरुष व ५ ते ६ कुटुंबांतील ३० सदस्यांना लाभ देण्यात येईल.

दुसऱ्या टप्प्यात १८९४ भिक्षेकऱ्यांना ते वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. तिसऱ्या टप्प्यात १६ हजार चौ. फूट जागेत बांधकाम करून सदर निवारागृहात १५० भिक्षेकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचा आराखडा केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यात आला. निवारा केंद्राच्या बांधकामावर खर्च करण्याऐवजी प्रकल्प तातडीने सुरू करण्यासाठी शहराच्या चार भागांत इमारती भाड्याने घेऊन भिक्षेकरीगृह सुरू करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार ई -निविदेच्या माध्यमातून सामाजिक संस्थांची निवड केली जाणार आहे. निवारा केंद्रात भिक्षेकऱ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, आरोग्य सुविधा, समुपदेशन व कौशल्य विकास, स्वयंरोजगार, मुलांकरिता शाळा, मनोरंजन अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

...

मनपाला १.५० कोटीचा निधी

निवारा केंद्रासाठी १ कोटी ५० लाखांचा निधी केंद्र सरकारकडून मनपाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पासाठी केंद्राकडून निधी मिळणार असून मनपाला यावर खर्च करावयाचा नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराला भिक्षेकरीमुक्त करण्याचा मानस आहे.

....

मनपा सभागृहात प्रस्ताव

शहराच्या विविध भागांत चार निवारा केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मनपा सभागृहागृहाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, १९ मार्चची सभा स्थगित करण्यात आली आहे. पुढील सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा आहे.