शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात सात गाई ठार

By admin | Updated: February 20, 2016 03:29 IST

तीन ते पाच वाघांनी शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यात सात जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, नऊ जनावरे गंभीर जखमी झालीत.

उमरेड, नवेगाव शिवारातील घटना : ९ जनावरे गंभीर जखमी, ३१ बेपत्ताउमरेड : तीन ते पाच वाघांनी शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यात सात जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, नऊ जनावरे गंभीर जखमी झालीत. शिवाय, ३१ जनावरे बेपत्ता आहेत. ही घटना उमरेड येथून १० कि.मी.वरील नवेगाव (साधू) शिवारात गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दहशत निर्माण झाली आहे. श्रीराम बनकर, रा. नवेगाव (साधू), ता. उमरेड यांची गावालगत शेती आहे. या शेतात गुरांची दावण असून, त्यात १२० जनावरे नेहमीप्रमाणे बांधली होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे पाच वाघांनी या जनावरांवर एकाचवेळी हल्ला चढविला. पहाटेपर्यंत वाघांची शिकारीसाठी ओढाताण सुरू होती. सर्वच जनावरे जीवाच्या आकांताने सुसाट सैरावैरा पळत होती, हंबरडा फोडत होती. अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रसंग श्रीराम बनकर यांनी प्रत्यक्ष अनुभवला. ते शेतातील मचाणावर जागली करीत होते.माहिती मिळताच ग्रामस्थांनी सकाळी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. दुसरीकडे, सूचना देऊनही सकाळी ९.३० वाजेपर्यंत वनविभागाचा एकही बडा अधिकारी घटनास्थळी हजर झाला नाही. ‘साहेब, गेले कुठे’ अशी विचारणा वनविभागातील वाहनचालक शकील शेख यांना केली असता ‘ते’ नागपूरहून येत असल्याचे सांगितले. वनरक्षक पी. टी. कामडी, वनमजूर ए. बी. वैरागडे, वन्यजीवचे नितीन राठोड, प्रशांत हिवरकर शेतकऱ्यांची विचारपूस करून पंचनामा करीत होते. (प्रतिनिधी)‘चांदी’चे बछडे असावेतया घटनेबाबत वन्यप्रेमी सुहास बोकडे, पक्षीतज्ज्ञ नितीन राहाटे यांच्याशी चर्चा केली असता, हे चांदी नामक वाघिणीचे बछडे असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. चांदीला चार बछडे असून, ते १८ महिन्यांचे आहेत. गाय व वासरांच्या शरीरावरील जखमा फारशा खोल नाहीत. हल्ला करीत असताना सैरावैरा पळत सुटल्यानेच वाघही भीतीने जनावरांवर तुटून पडले असावेत आणि यातच जनावरांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा हल्ला नवलच वाघ कधीच समूहाने शिकार करीत नाही. तो गनिमी काव्याने शिकार करतो. परंतु, चांदीचे बछडे १८ महिन्यांचे आहेत. ते शिकार शोधण्यासाठी समूहाने पोहचले. जनावरांच्या कळपावर हल्ला करताच जनावरे सुसाट पळायला लागली. वाघही गोंधळले आणि त्यातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. असा प्रकार सहसा घडत नाही. बछड्यांच्या सोबतीला चांदी नसावी, असेही बोलले जात आहे.मोबदला ताबडतोब हवावन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे ठार झाल्यानंतर वनविभाग तातडीने मोबदला देत नाही, अशी कैफियत विठ्ठल बोढे यांनी मांडली. या हल्ल्यात ठार व जखमी झालेल्या जनावरांच्या मालकांना तातडीने बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी माजी नगरसेवक दयालचंद्र पौनीकर, गोविंदा बोढे, देवराव कोळसे यांनी केली आहे. अभयारण्याच्या सभोवताल सौरऊर्जा कुंपण लावण्याची मागणीही सचिन तळेकर यांनी केली. लोकप्रतिनिधी व वनविभाग या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.वाघांना पाहून घाबरलोमी मचाणावर झोपून होतो. त्यातच जनावरांच्या हंबरण्याचा आवाज ऐकायला आला. वरूनच वाकून बघितले तेव्हा एक वाघ काही अंतरावरच गाईवर तुटून पडत होता. दोन-तीन वाघ काही अंतरावर गाईच्या कळपाजवळ असावेत. त्या ठिकाणीही ओढाताण सुरू होती. दावे तोडून जनावरे शेतात पळत सुटली होती. मी खूप घाबरलो. कधी वाकून बघायचो तर, कधी पांघरून घ्यायचो. सकाळी ६ वाजताच्या सुमारासच मचाणावरून खाली उतरलो. त्यानंतर लोक गोळा व्हायला लागले.- श्रीराम बनकर, शेतकरी वाघांना लागली ‘चटक’गाईला जंगलात दावणीला बांधून वाघाच्या शुटींग प्रकरणाचा लोकमतने नुकताच पर्दाफाश केला. सकाळीच लोकमतची चमू घटनास्थळी दाखल झाली. अशातच ‘भाऊ, वाघाला गाईची चटक लागली’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांनी ‘गाय’ प्रकरण किती गंभीरपणे घेतले, याचा हा नमुनाच होता.