शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती : जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 20:29 IST

सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्दे‘फेसबुक लाईव्ह’ : साधला नागरिकांशी संवाद, प्रश्नांची उत्तरेही दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे आणि देशाचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढणार काय, २० एप्रिलनंतर दुकाने सुरू होतील काय, ग्रामीण भागात असलेल्या एमआयडीसी मधील उद्योग सुरू होतील का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, लॉकडाऊनची मर्यादा कमी करणे अथवा वाढविणे हे नागरिकांच्या हातात आहे. लॉकडाऊनचे पालन झाले तर कोरोनाची साखळी तुटेल आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल.बाहेरगावी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या शहरात जाता येईल का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्वत:ला आहे त्या ठिकाणीच ठेवणे, हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे आहे तेथेच राहा. तेथे काही अडचणी येत असेल तर स्थानिक प्रशासन नक्कीच मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला.नागपूर शहरात ज्या-ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्या भागातील सुमारे तीन किलोमीटर परिघाचा परिसर सील करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजानजी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, रवि गीते, मेट्रोचे अखिलेश हळवे, आनंद नगरकर, आनंद अंबेकर, बरखा गोयनका आदी उपस्थित होते.लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती 

२० एप्रिल रोजीच्या परिस्थितीनुसार निर्णयजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या आजच नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसार १९ एप्रिलपर्यंत परिस्थितीचे अवलोकन केले जाईल. परिस्थिती आटोक्यात असली तर काही गोष्टींमध्ये शिथिलता देता येईल. त्यामुळे याबाबतचा निर्णय हा २० एप्रिल रोजी असलेल्या परिस्थितीवर आधारित राहील.दररोज ६५ ते ७० हजार लोकांना मदतलॉकडाऊनदरम्यान निराधार ज्येष्ठ नागरिक, गरजू व्यक्ती, दिव्यांगांना त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन समाजसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत भोजन, दैनंदिन आवश्यकतेचे सामान पोहचवीत आहेत. दररोज सुमारे ६५ ते ७० हजार लोकांपर्यंत मदत पोहचविली जात आहे. रस्त्यावर भटकंती करणारे, बेघर लोकांनासुद्धा मनपाने उभारलेल्या बेघर निवाऱ्यात ठेवण्यात आले असून, तेथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे आणि त्यांनी चहा, नाश्ता, भोजन पुरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरFacebookफेसबुक