शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती : जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 20:29 IST

सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्दे‘फेसबुक लाईव्ह’ : साधला नागरिकांशी संवाद, प्रश्नांची उत्तरेही दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे आणि देशाचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढणार काय, २० एप्रिलनंतर दुकाने सुरू होतील काय, ग्रामीण भागात असलेल्या एमआयडीसी मधील उद्योग सुरू होतील का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, लॉकडाऊनची मर्यादा कमी करणे अथवा वाढविणे हे नागरिकांच्या हातात आहे. लॉकडाऊनचे पालन झाले तर कोरोनाची साखळी तुटेल आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल.बाहेरगावी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या शहरात जाता येईल का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्वत:ला आहे त्या ठिकाणीच ठेवणे, हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे आहे तेथेच राहा. तेथे काही अडचणी येत असेल तर स्थानिक प्रशासन नक्कीच मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला.नागपूर शहरात ज्या-ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्या भागातील सुमारे तीन किलोमीटर परिघाचा परिसर सील करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजानजी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, रवि गीते, मेट्रोचे अखिलेश हळवे, आनंद नगरकर, आनंद अंबेकर, बरखा गोयनका आदी उपस्थित होते.लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती 

२० एप्रिल रोजीच्या परिस्थितीनुसार निर्णयजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या आजच नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसार १९ एप्रिलपर्यंत परिस्थितीचे अवलोकन केले जाईल. परिस्थिती आटोक्यात असली तर काही गोष्टींमध्ये शिथिलता देता येईल. त्यामुळे याबाबतचा निर्णय हा २० एप्रिल रोजी असलेल्या परिस्थितीवर आधारित राहील.दररोज ६५ ते ७० हजार लोकांना मदतलॉकडाऊनदरम्यान निराधार ज्येष्ठ नागरिक, गरजू व्यक्ती, दिव्यांगांना त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन समाजसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत भोजन, दैनंदिन आवश्यकतेचे सामान पोहचवीत आहेत. दररोज सुमारे ६५ ते ७० हजार लोकांपर्यंत मदत पोहचविली जात आहे. रस्त्यावर भटकंती करणारे, बेघर लोकांनासुद्धा मनपाने उभारलेल्या बेघर निवाऱ्यात ठेवण्यात आले असून, तेथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे आणि त्यांनी चहा, नाश्ता, भोजन पुरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरFacebookफेसबुक