शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
3
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
4
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
5
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
6
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
7
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
8
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
9
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
10
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
11
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
12
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
14
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
15
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
17
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
18
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
19
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
20
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांची सुरक्षा आता शेतकऱ्यांकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्‍ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांवर पाट्या टाकण्याचे काम पूर्ण झाले. या पाट्या चोरी होतात. त्यामुळे याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्‍ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांवर पाट्या टाकण्याचे काम पूर्ण झाले. या पाट्या चोरी होतात. त्यामुळे याची जबाबदारी आता बंधाऱ्याचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिली.

अध्यक्षा बर्वे यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी जलव्यस्थापन समितीची बैठक झाली. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती भारती पाटील, नेमावली माटे, उज्ज्वला बोढारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीतनंतर पत्रकारांशी बोलताना बर्वे यांनी सांगितले, जिल्ह्यात सव्वासहाशेच्या जवळपास कोल्हापुरी बंधारे आहेत. यातील ६१४ बंधाऱ्यांवर पाट्या टाकण्यात आल्या. या वर्षी पहिल्यांदाच ९८ टक्के बंधाऱ्यांवर पाट्या टाकण्याचे काम पूर्ण झाले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी येथील पाण्याचा उपयोग होणार आहे. पण पाट्या चोरीला जातात. त्यामुळे याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांवर देण्याचा निर्णय घेण्यात आला. २५ जुन्या पिण्याच्या पाईप लाईन जीर्ण झाल्या आहेत. त्यांना बदलण्यासाठी शासनाकडे निधी मागण्यात येईल. ८३९ बोअरवेल बंद आहेत. त्यांना रेकार्डवरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याते त्यांनी सांगितले.