शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

‘पढेंगे तो बढेंगे’ म्हणत सचिन पायलट यांचे योगींना उत्तर

By कमलेश वानखेडे | Updated: November 13, 2024 17:58 IST

Nagpur : भाजपच्या डबल इंजिनमधून धूर निघतोय

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मतदारांना ‘बटेंगे तो कटेंगे’ असे सांगत आहेत. त्यांची ही घोषणा अप्रत्यक्षपणे मतदारांना धमकवणारी व भीती दाखविणारी आहे. सगळ्यांना घेऊन चालण्या ऐवजी ते अशी भाषा बोलतात हे योग्य नाही. अयोध्येत त्यांची लोकसभेची जागा हरली त्याला काय म्हणायचे, असा सवाल करीत ‘पढेंगे तो बढेंगे’ हे काँग्रेसचे धोरण असून ते आम्ही आधीपासूनच राबवित आहोत, असे उत्तर काँग्रेस नेते व राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री खा. सचिन पायलट यांनी दिले.

विदर्भातील निवडणूक प्रचारासाठी खा. सचिन पायलट हे बुधवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रचारची गती जसजशी वाढत आहे त्याप्रमाणे भाजपचे बोल बिघडत आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी सांगितले की आम्ही पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन चालत आहोत. भाजप डबल इंजिन सरकार सांगते मात्र त्या इंजिन मधून धूर निघत आहे. डबल इंजिन सरकार असताना त्यांना निवडणुकीच्या आधी योजनांची घोषणा का करावी लागत आहे, असा सवाल त्यांनी केला. यांनी योजना आणली तर हे दाता आणि विरोधी पक्षाने आणली तर तिला रेवडी वाटणे म्हणणे हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. आम्ही विकासाबद्दल बोलतो. कुणावर चिखलफेक करीत नाही. महाराष्ट्रात आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा त्यांनी केला. डाटा गोळा करण्यासाठी जनगनना आवश्यक आहे. त्यातून कोणाचा किती भाग आहे ते समजते. त्यानुसार त्याचे विभाजन करता येऊ शकते. गरजवंत लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री आदी उपस्थित होते. 

तर भाजपने संविधानाशी छेडछाड केली असतीभाजपने लोकसबा निवडणुकीत ४०० पार चा नारा दिला होता. मात्र, जनतेने त्यांना जागा दाखवली. त्यांना ४०० जागा मिळाल्या असत्या तर त्यांनी संविधानाशी छेडछाड केली असती, असा दावा सचिन पायलट यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sachin Pilotसचिन पायलटnagpurनागपूरBJPभाजपाcongressकाँग्रेस