शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ देतोय महागाईचा झटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST

नागपूर : जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडल्यानंतर यंदाच्या हंगामात तांदळाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या तांदळाच्या किमती ...

नागपूर : जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडल्यानंतर यंदाच्या हंगामात तांदळाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या तांदळाच्या किमती दर्जानुसार ६ ते १० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. हंगामात धानाचे उत्पादन कमी झाले असून उतारीही कमी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी उपलब्धता तसेच निर्यात वाढल्याने तांदळाच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तांदळाच्या किमतीत दीड महिन्यापासून वाढत आहे. सर्वाधिक तेजी चिन्नोर आणि जय श्रीराम तांदळात आली आहे. गेल्या वर्षी चिन्नोर किरकोळमध्ये ४४ ते ४६ रुपये किलो होता, तो आता ५५ ते ५७ रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय विदर्भातील भंडारा, ब्रह्मपुरी आणि नागभीड येथील जय श्रीराम तांदूळ ६ ते ८ रुपयांनी वाढून दर्जानुसार ४५ ते ५२ रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय आंध्रप्रदेश आणि कर्नाटकचा जय श्रीराम ३८ ते ४२ रुपयांवर गेला आहे. याशिवाय किरकोळमध्ये बीपीटी ३२ ते ३५, एचएमटी ३७ ते ४०, नवीन सुवर्णा २४ ते २६ आणि कर्नाटक तांदूळ ४१ ते ४३ रुपयांवर गेला आहे. या तांदळात ४ ते ६ रुपयांची तेजी आल्याचे कळमन्यातील न्यू ग्रेन मार्केटमधील व्यापारी रमेश उमाठे यांनी सांगितले.

पावसामुळे पिकांचे नुकसान

पीक काढणीला असतानाच झालेली गारपीट आणि मुसळधार पावसामुळे सर्वच राज्यात धान पिकाचे जवळपास ३० टक्के नुकसान झाले आहेत. त्यामुळे भाववाढ झाली आहे. कळमना आणि नागपूरच्या बाजारात सर्वच प्रकारच्या तांदळाला मागणी आहे. मुख्यत्त्वे चिन्नोर आणि जय श्रीराम तांदळाची जास्त विक्री होते. याच तांदळाचे भाव वाढल्याने ग्राहकांना फटका बसत आहे. चिन्नोर ५८ रुपये तर वैदर्भीय जय श्रीराम ४५ ते ५२ रुपयांपर्यंत भाव आहेत. उमाठे म्हणाले, यंदा चीन, व्हिएतनाम आणि अफ्रिकन देशांमध्ये निर्यात वाढल्याने देशांतर्गत किमतीत वाढ होत आहे. वित्तीय वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निर्यातीत ७० टक्के वाढ झाली आहे. पुढे भाव कमी होण्याची काहीही शक्यता नसल्याचे उमाठे यांनी स्पष्ट केले.