शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशा अपघातानंतर टीकेची धार बोथट करण्यासाठी रेल्वेकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजावाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 08:00 IST

Nagpur News ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरातून उठलेली टीकेची झोड कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजवाजा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे.

नरेश डोंगरे
नागपूर : ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरातून उठलेली टीकेची झोड कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजवाजा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे.


भारतीय रेल्वेचा सर्वांत भीषण मानला जाणारा अपघात ओडिशातील बालासोरमध्ये २ जूनच्या रात्री घडला. २७५ निर्दोष प्रवाशांचे हकनाक बळी गेल्याने आणि शेकडो प्रवासी जखमी झाल्याने ओडिशातील हा अपघात देश-विदेशात चर्चेला आला आहे.

या भीषण अपघाताचे नेमके कारण कोण आणि त्याला जबाबदार कोण, याची विचारणा होत असतानाच रेल्वेे प्रशासनासह सरकारवरही टिकेची झोड उठली आहे. प्रत्येक वळणावर या अपघाताची चर्चा होत असतानाच रेल्वे अधिकाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीतील केलेल्या खर्चाचा आढावा व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून मांडला आहे.

सुरक्षेवर भारतीय रेल्वेचा खर्च कसा करण्यात आला ते सांगताना २०१७ मध्ये राष्ट्रीय रेल सुरक्षा कोष (आरआरएसके) निधी अंतर्गत सुरक्षेच्या कार्याकरिता अव्यय (नॉन लॅप्सेबल) खर्चासह १ लाख कोटी रुपयांच्या निधीसह स्थापना झाली आणि भारतीय रेल्वेने २०१७ ते २०२२ पर्यंत सुरक्षेच्या कामांवर १ लाख कोटींहून अधिक खर्च केल्याचे म्हटले आहे.
या पाच वर्षांत ट्रॅक नूतनीकरणाचा खर्च सातत्याने वाढला असून २०१७-१८ मध्ये खर्च ८,८८४ कोटी होता, २०२१-२२ मध्ये तो १६,५५८ कोटी झाल्याचे सांगितले आहे. गेल्या ५ वर्षात रेल्वेने यावर ५८,०४५ कोटी रुपये खर्च केल्याचाही दावा केला आहे. वर्ष २००४-२००५ ते २०१३-१४ मधील ४७,०३९ कोटींच्या तुलनेत २०१४-१५ ते २०२३-२४ पर्यंत ट्रॅक नूतनीकरणावर एकूण १,०९,०२३ कोटी खर्च झाल्याचेही म्हहटले आहे.

पूल, लेव्हल क्रॉसिंग गेट्स (आरओबी/ आरयूबी) सिग्नलिंग कामे यांसारख्या सुरक्षेशी संबंधित कामांवरील खर्चाचा आढावा मांडताना २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ७०,२७४ कोटी खर्च झाला. तर, २०१४-१५ ते २०२३-२४ या कालावधीत १,७८,०१२ कोटी खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे.

अपघात अन् सुरक्षेची आकडेवारी

या संबंधाने रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क करून नेमकी अपघातानंतरच ही सुरक्षेच्या कामांची (निधीची) आकडेवारी मांडण्याची गरज का वाटली, असा प्रश्न केला असता ते याबाबत समाधानकारक काही सांगू शकले नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे