शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासी दहशतीत

By admin | Updated: March 2, 2015 02:28 IST

स्वाईन फ्लूमुळे उपराजधानीत थैमान घातले असताना खबरदारी म्हणून तोंडावर मास्क लावून नागरिक घराबाहेर पडत आहेत. रेल्वेस्थानकावर सर्वाधिक गर्दी होत असल्यामुळे ...

नागपूर : स्वाईन फ्लूमुळे उपराजधानीत थैमान घातले असताना खबरदारी म्हणून तोंडावर मास्क लावून नागरिक घराबाहेर पडत आहेत. रेल्वेस्थानकावर सर्वाधिक गर्दी होत असल्यामुळे येथे स्वाईन फ्लूचा धोका सर्वात जास्त आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण असून रविवारी असंख्य प्रवासी तोंडाला मास्क, रुमाल बांधुन स्थानकात प्रवेश करताना दिसले.अचानक बदललेल्या हवामानामुळे स्वाईन फ्लूसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. उपराजधानीत स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या ५८ वर पोहोचली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिक विशेष खबरदारी घेत आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १२५ ते १३५ रेल्वेगाड्या आणि ४० ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. विविध राज्यातून येणाऱ्या या प्रवाशांमुळे स्वाईन फ्लू पसरण्याचा धोका अधिक आहे. याशिवाय प्लॅटफार्मवर गाडी आल्यानंतर एकच गर्दी होऊन प्रवाशांना दाटीवाटीतून मार्ग काढत बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत एखाद्या प्रवाशाला स्वाईन फ्लू असल्यास त्याची लागण इतरांना होण्याची दाट शक्यता असते. रविवारी नागपूर रेल्वेस्थानकाच्या सर्वच प्लॅटफार्मवर प्रवासी तोंडाला मास्क आणि रुमाल लावून रेल्वेस्थानक परिसरात फिरताना दिसले. रेल्वेस्थानकावर ड्युटी करणारे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस, रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकणारे हॉटेल्सचे वेटर सर्वच जण स्वाईन फ्लूबाबत खबरदारी घेत होते. (प्रतिनिधी)