शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पारडी उड्डाणपुलाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह : बांधकामाची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 21:32 IST

पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) करण्यात येत आहे. बांधकामाची गती संथ असतानाही ‘एनएचएआय’चे अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. भूमिपूजनापासून आजपर्यंत या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिक बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. बांधकाम केव्हा पूर्ण होणार आणि या मार्गावर निरंतर होणाऱ्या अपघातात आणखी किती जणांचा बळी जाणार, या प्रश्नावर नागरिक संतप्त आहेत.

ठळक मुद्दे‘एनएचएआय’ने पुढाकार घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) करण्यात येत आहे. बांधकामाची गती संथ असतानाही ‘एनएचएआय’चे अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. भूमिपूजनापासून आजपर्यंत या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिक बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. बांधकाम केव्हा पूर्ण होणार आणि या मार्गावर निरंतर होणाऱ्या अपघातात आणखी किती जणांचा बळी जाणार, या प्रश्नावर नागरिक संतप्त आहेत. 

ऑगस्ट २०१४ मध्ये भूमिपूजनसन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारडी अंडरब्रीजचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्पाला उड्डाणपुलामध्ये रूपांतरित करण्यात आले होते. भूमिपूजनाला पाच वर्षे पूर्ण झाली असून अजूनही पुलाचे काम अपूर्ण आहे. बांधकामाचे चुकीचे नियोजन आणि संथ गतीने सुरू असलेल्या बांधकामामुळे या भागातील नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. बांधकाम सुरू असताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याचा एनएचएआय आणि लोकप्रतिनिधींवर काहीही परिणाम झालेला नाही.बांधकाम जीडीसीएल व एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करीत आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्यावर विविध पक्ष आणि नागरिक संघटनांनी अनेकदा आंदोलन केले आहेत. बरेचदा महामार्गावरील वाहतूक थांबविली होती. भंडारा रोडवर दोन्ही बाजूला लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातून वाहन काढणे अत्यंत जोखिमेचे काम आहे. रस्त्यावरून पायदळ चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. पारडी उड्डाण पुलाच्या अपूर्ण विकासकामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना फटकारले आहे. पण कारणे सांगून मंत्र्याच्या आदेशाकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य 
सदर प्रतिनिधीने कळमना मार्ग आणि भंडारा महामार्गावरील उड्डाण पुलाची पाहणी केली असता बांधकाम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार नाहीच, अशी स्थिती आहे. कळमना मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. पारडी चौकातून कळमना मार्केटकडे जाणारा एक बाजूचा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. या मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम एक वर्षापासून सुरू आहे. जड वाहतुकीमुळे रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून ट्रकची वाहतूक असल्यामुळे धूळ उडते. दुचाकी वाहनचालकांना थोडावेळ थांबूनच जावे लागते.पारडी चौकापासून भंडारा महामार्गावर जवळपास एक कि़मी. अंतरावर पूनापूर मंदिराकडे जाणाºया वळण रस्त्यापर्यंत बांधकामाच्या दोन्ही बाजूला बॅॅरिकेट्स लावले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच अतिक्रमणाची भर पडली आहे. त्यामुळे १२ मे रोजी एका डम्परच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा अपघातात मृत्यू झाला होता. उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेले पिल्लर अर्धवट आहेत. या महामार्गावर जड वाहनांची वाहतूक निरंतर सुरू असते. हा मार्ग गंभीर अपघातासाठी ओळखला जातो. बांधकाम पूर्ण करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.उड्डाण पुलाची वैशिष्ट्ये

  •  ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.
  •  ४४८ कोटींची गुंतवणूक.
  •  मार्च २०१६ मध्ये काम सुरू.
  •  मार्च २०१९ मध्ये बांधकाम पूर्णत्वाचे लक्ष्य.
  •  डिसेंबर २०१८ मध्ये ३० टक्के बांधकाम.

डिसेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण होणारपारडी आणि कळमना उड्डाण पुलाचे बांधकाम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. पारडी नाका ते इतवारी जैन मंदिर, वैष्णोदेवी चौक, कळमना मार्केट येथे उड्डाण पूल होणार आहे. सध्या बांधकाम वेगात सुरू आहे. प्रकल्पासाठी हवी असलेली जागा मनपाने एनएचएआयला अजूनही हस्तांतरित केलेली नाही.नीलेश येवतकर, प्रकल्प संचालक (पीआययू-१),राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

टॅग्स :nagpurनागपूरhighwayमहामार्ग