शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

गाव तिथे गोडावून योजनेची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:08 IST

नागपूर : शेतकऱ्यांना त्यांचा माल ठेवून तारण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गाव तिथे गोडावून योजना जिल्ह्यात राबविण्यात यावी, शेतकऱ्यांना ...

नागपूर : शेतकऱ्यांना त्यांचा माल ठेवून तारण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गाव तिथे गोडावून योजना जिल्ह्यात राबविण्यात यावी, शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. गाव तिथे गोडावूनसाठी जिल्हा परिषदेच्या मागील दोन्ही सर्वसाधारण सभांमध्ये प्रस्ताव मांडण्यात आले; परंतु यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. आता तरी यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडली.

यावर लवकरच एक नियोजन बैठक लावण्यात येईल असे आश्वासन अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी यावेळी दिले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा नसल्याने त्याची दुरुस्ती करण्यास त्रास होत आहे. या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा दिला तर शासनाच्या विविध योजनांतून त्याला निधी उपलब्ध करून त्यांचे काम करता येईल, असेही ते म्हणाले. सभागृहात शांता कुमरे यांनी आरोग्य, शिक्षण यंत्रणेतील रिक्त पदांवर लक्ष वेधले. चंद्रशेखर कोल्हे यांनी पशुसंवर्धन विभाग रिक्त पदांमुळे अकार्यक्षम झाल्याची टीका केली. शिवसेनेचे संजय झाडे यांनी समाज कल्याणचा १० टक्के निधी खर्चच होत नसल्याचा आरोप केला. जिल्हा परिषदेत ८० टक्के सदस्य नवीन असल्याने त्यांना यशदामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे, महापालिका विधानसभेसारखे सर्वच पक्षांना जि.प.मध्ये स्वतंत्र कक्ष देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

- नरखेड, रामटेकात अनेक पदे राहतात रिक्त

समुपदेशानाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे त्यांच्या सोईनुसार आवडीचे तालुके देण्यात येतात. परंतु यात नागपूर शहरालगतच्याच तालुक्यांची अधिकारी आणि कर्मचारी निवड करतात. यामुळे नरखेड व रामटेक तालुक्यात कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी मिळत नाही आणि पयार्याने तेथील पदे हे रिक्त असतात. याचा फटका दुर्गम भागातील कार्यप्रणालीवर होत असते, या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी लक्ष वेधले.

- कृषी कायद्यांवरून गदारोळ

संपूर्ण देशात संसदेने पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून एकीकडे गदारोळ सुरू असतानाच याचे पडसाद शुक्रवारच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले. कृषी कायद्यांवरून सत्तापक्ष व विरोधक एकमेकांपुढे उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले. या कायद्यांना सत्ताधाऱ्यांनी अदानी, अंबानी यांच्या हिताचे कायदे असल्याचा आरोप केला. तर विरोधकांनी हे कायदे शेतकरीहिताचे असल्याचे सांगून हे कायदे जर सत्ताधाऱ्यांना शेतकरीविरोधी असल्याचे वाटत असेल तर हे त्यांचे दुर्दैव असल्याचे म्हणाले.