शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

...तर कायमचा मास्क वापरण्याची येईल वेळ; नागपूरसह विदर्भातील ४ शहरांच्या हवेत घातक सल्फर व नायट्रोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 14:10 IST

नागपूर, चंद्रपूरच्या लाेकांवर एनओ-टू, एसओ-टूचे संकट : गाेंदिया, अमरावतीसह मुंबईकरही प्रभावित

निशांत वानखेडे

नागपूर :विदर्भातील नागपूर व चंद्रपूरसह गाेंदिया व अमरावतीच्या वातावरणात सल्फर डायऑक्साइड (एसओ-२) व नायट्राेजन डायऑक्साइड (एनओ-२) चा स्तर प्रचंड वाढला आहे. कोपर्निकस ॲटमॉस्फिअर मॉनिटरिंग सर्व्हिस उपग्रहाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचे चित्र जारी केले असून आर्थिक राजधानी मुंबईसुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात आहे. याच कारणामुळे सध्या या शहरांमध्ये श्वसनाचे, फुफ्फुसाचे विकार, अस्थमा व त्वचेचे आजार वाढले असून कायमस्वरूपी मास्क घालण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी भीती डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे.

देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या औष्णिक वीज केंद्रामधून राखेची धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत सोडली जाते. त्यात एनओ-२, एसओ-२चे प्रमाण प्रचंड असते. ही राख हवेच्या दिशेने वाहत जाते व त्या भागाला प्रभावित करते. अवकाशातून घेतलेल्या उपग्रह चित्राद्वारे नागपूर आणि चंद्रपूर ही शहरे दाेन्ही वायूंच्या बाबतीत अत्याधिक प्रदूषित तर गाेंदियाच्या वातावरणात सल्फर डायऑक्साइड आणि अमरावतीमध्ये नायट्राेजन डायऑक्साइडचा लाल थर जमा झालेला दिसताे. याशिवाय मुंबईच्या आसपासचा परिसरातही एसओ-२, एनओ-२ वायूचा स्तर वाढल्याचे या उपग्रह सर्वेक्षणात दिसून येत आहे.

एसओ-२ वायू काेळसा आणि क्रूड ऑइलच्या ज्वलनातून बाहेर पडताे. एनओ-२ हा वायूसुद्धा वीज केंद्र आणि वाहनांच्या धुरातून बाहेर पडताे. देशात २०० च्यावर औष्णिक वीज केंद्र आहेत, ज्यातील २० प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. एका माेठ्या प्रकल्पामधून दरराेज ५०० टनांच्या जवळपास वायू हवेत फेकला जातो. यामुळे विदर्भात आम्लवर्षा (ॲसिड रेन) हाेण्याचा धाेका वाढला आहे. पाण्यातील आम्लता वाढते. त्याचे गंभीर परिणाम जलीय जीव आणि वनस्पतींवर होतात. वृक्ष, जंगल आणि शेतीही प्रभावित हाेते.

आराेग्यावर घातक परिणाम

- एनओ-२, एसओ-२ चा स्तर वाढल्याने श्वासनलिकेची प्रतिकार शक्ती कमी हाेते. यामुळे सामान्य लाेकांमध्ये भविष्यात फुप्फुसासंबंधी आजार बळावण्याची शक्यता असते.

- आधीपासूनच दमा, अस्थमासारखे श्वसनाचे आजार असलेल्यांचा त्रास अत्याधिक बळावताे.

- लाेकांमध्ये डाेळे व त्वचेसंबंधीचे आजारही वाढल्याचे दिसून येत आहे.

- या अतिविषारी वायूची स्थिती अशीच राहिली तर लाेकांना कायमचा मास्क घालण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

- डाॅ. समीर अर्बट, पल्माेनाॅलाॅजिस्ट

सरकारने औष्णिक वीज केंद्रासाठी फ्युअल गॅस डिसल्फरायझेशन (एफजीडी), बर्नर डिझाइन चेंज, ईएसपी यासारख्या यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बहुतेक वीज केंद्रांत त्या नाहीत किंवा असलेल्या ठिकाणी बंद किंवा नादुरुस्त आहेत.

- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण, हवामान अभ्यासक

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषणVidarbhaविदर्भ