शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसबीसी’ला स्वतंत्र आरक्षणासाठी हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 06:00 IST

Nagpur News court एसबीसी (विशेष मागासवर्ग) प्रवर्गाला २ टक्के स्वतंत्र आरक्षण मिळावे याकरिता मृणाल येंगलवार या विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे दोन टक्के वेगळे करण्याची मागणीसध्या ‘ओबीसी’मध्ये समावेश

राकेश घानोडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एसबीसी (विशेष मागासवर्ग) प्रवर्गाला २ टक्के स्वतंत्र आरक्षण मिळावे याकरिता मृणाल येंगलवार या विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार या प्रवर्गाला न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे न्यायालयाचे दार ठोठवावे लागले, असा आरोप तिने याचिकेत केला आहे.

राज्य सरकारने ८ डिसेंबर १९९४ रोजीच्या निर्णयाद्वारे एसबीसी प्रवर्ग तयार करून त्यामध्ये ओबीसी (इतर मागासवर्ग) प्रवर्गातील ४२ जातींचा समावेश केला. तसेच, एसबीसी प्रवर्गासाठी १२ कल्याणकारी योजना जाहीर केल्या आणि सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये २ टक्के आरक्षण दिले. परंतु, या आरक्षणामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यावर गेल्याने उच्च न्यायालयाने एसबीसीच्या २ टक्के आरक्षणावर स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने १ ऑगस्ट २००६ रोजीच्या निर्णयाद्वारे एसबीसीला ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणात समावून घेतले. परिणामी, एसबीसीला स्वतंत्र २ टक्के आरक्षण मिळत नाही. त्यांना ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणात स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. राज्य सरकारने संबंधित ४२ जातींच्या विकासाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून एसबीसी प्रवर्ग तयार केला होता. परंतु, एसबीसी प्रवर्गाला सरकारच्या ध्येयानुसार अद्याप पूर्ण फायदे मिळले नाही. सर्व आश्वासने केवळ पेपरवर आहेत. एसबीसीच्या २ टक्के आरक्षणाला एकूण ५० टक्के आरक्षणात स्थान मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे एसबीसीचे नुकसान होत आहे. करिता, राज्य सरकारने ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणातील २ टक्के आरक्षण एसबीसीसाठी वेगळे करावे असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.

वैद्यकीय प्रवेशातील जागा रिक्त ठेवा

एसबीसीमध्ये मोडणाऱ्या पद्मशाली जातीच्या याचिकाकर्तीने ५१० गुणांसह नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. परंतु, एसबीसीला २ टक्के स्वतंत्र आरक्षण मिळत नसल्यामुळे स्वप्नभंग होण्याची शक्यता आहे. करिता, वैद्यकीय प्रवेशातील ओबीसी कोट्याच्या २ टक्के जागा याचिकेवर निर्णय होतपर्यंत रिक्त ठेवण्यात याव्यात अशी विनंती याचिकाकर्तीने न्यायालयाला केली आहे.

सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश

याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकाकर्तीच्या मागणीवर चार आठवड्यात भूमिका मांडण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्तीतर्फे ॲड. एन. डी. ठोंबरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय