शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात नांदतय शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 9:53 PM

समाजात सेवाभावाने कार्य करणारी माणसे कुठल्या सत्कारासाठी कार्य करीत नाही तर या सेवेतच त्यांना आनंद मिळतो. मात्र अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. कारण अशा त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात शांतता नांदत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. सी.मो. झाडे फाऊंडेशनच्या सत्कार समारोहात ते बोलत होते.

ठळक मुद्देझाडे फाऊंडेशनच्या पुरस्कारांचे वितरणगणेश खवसे, पान्हेरकर, बिजमवार, बनकर, धाबेकर यांना प्रदान

आॅनलाईन लोकमतनागपूर : समाजात सेवाभावाने कार्य करणारी माणसे कुठल्या सत्कारासाठी कार्य करीत नाही तर या सेवेतच त्यांना आनंद मिळतो. मात्र अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. कारण अशा त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात शांतता नांदत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. सी.मो. झाडे फाऊंडेशनच्या सत्कार समारोहात ते बोलत होते.सामाजिक, शैक्षणिक, अपंग-क्रीडा, आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या  मान्यवरांना सी.मो. झाडे फाऊंडेशनच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवीन वर्षाचे निमित्त साधून सर्वोदय आश्रम येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारोहात मेळघाटात सेवा देणारे डॉ. रवींद्र कोल्हे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म. गडकरी, फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे, विश्वस्त नारायण समर्थ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक गणेश खवसे यांना सी.मो. झाडे ग्रामीण पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांच्यासह श्रीराम पान्हेरकर यांना डॉ. गोविंद समर्थ अपंग सेवाकार्य पुरस्कार, सुशीला बिजमवार यांना मीराबेन शाह उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार, डॉ. डी.बी. बनकर यांना ना.बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि डॉ. अशोक धाबेकर यांना डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिवाजीराव मोघे म्हणाले, ४५० गावांत केलेल्या सर्वेक्षणानुसार व्यसनाधीनता ही ग्रामीण भागातील मोठी समस्या असून, गरिबीचे कारण असल्याचे लक्षात आले. त्यासाठी व्यसनमुक्तीचे धोरण राबविणे आवश्यक आहे. साहित्यिकांनी या विषयावर व्यापक लेखन न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खर्चिक लग्नकार्य टाळण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, देशात गरीब व श्रीमंतामधील दरी वाढत आहे. शिक्षण महाग होत असल्याने गरीब घरच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. ही दरी संपविण्यासाठी लोकनीती ठरविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मा.म. गडकरी म्हणाले, समाज उत्थानाच्या कामात आपला सहभाग असला पाहिजे. गांधी विचार व  राष्ट्राच्या  विचारातून काम करणारे लोक विपरीत परिस्थितीवर मात करून जगाला तारू शकतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बळवंत मोरघडे यांनी केले. विकास झाडे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला माजी मंत्री हरिभाऊ नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, प्राचार्य बबनराव तायवाडे, काँग्रेस नेते अतुल कोटेचा, योगतज्ज्ञ विठ्ठलराव जीभकाटे, सुधा गडकरी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर