शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शाळा शुल्क कमी करण्यासाठी पालकांची गर्जना ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST

नागपूर : काेराेना काळात शाळा बंद असताना पालकांवर लादण्यात आलेले शाळा शुल्क निम्मे करण्याची मागणी पालकांद्वारे केली जात आहे. ...

नागपूर : काेराेना काळात शाळा बंद असताना पालकांवर लादण्यात आलेले शाळा शुल्क निम्मे करण्याची मागणी पालकांद्वारे केली जात आहे. यासाठी जागरूक पालक संघटनेच्या वतीने रविवारी संविधान चाैक येथे धरणे आंदाेलन करण्यात आले.

संपूर्ण जगात काेराेना महामारीमुळे नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. यापासून भारत देश आणि त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा सुटलेला नाही. जनतेचा या महामारीमुळे रोजगार, व्यापार, नोकरी बंद होत्या, अशा परिस्थितीमध्ये राज्यातील शिक्षण व्यवस्थाही बंदच हाेत्या. त्यानंतर काही काळापासून शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले, तेही एक तास किंवा ४० मिनिटांसाठी. यावेळी ना शाळांना साेयी-सुविधांसाठी खर्च करावा लागला, ना शिक्षणासाठी. केवळ पालकांनाच इंटरनेटपासून सर्व सुविधा कराव्या लागल्या. असे असताना शाळांकडून १०० टक्के शुल्क वसूल केले जात आहे. यासाठी शाळांकडून कर्मचाऱ्यांमार्फत पालकांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे पालक मानसिक तणावात असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नितीन नायडू यांनी सांगितले. या काळात शाळांना शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना एकतर पगार दिले नाहीत किंवा ५० ते ७० टक्के पगार कापण्यात आला. मात्र, पालकांकडून १०० टक्के शुल्काची अपेक्षा केली जात असल्याचा आराेप नायडू यांनी केला.

अशा वेळी राज्य शासनाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे; पण ताेही मिळत नसल्याची टीका विदर्भ पॅरेंट असाेसिएशनचे संदीप अग्रवाल यांनी केली. सरकारकडून मे महिन्यात एक तकलादू अध्यादेश काढून सरकार चूप झाले आहे. अशात खाजगी शाळा प्रशासनाने सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयात आवाहन दिल्यामुळे निर्णय थांबला. महाराष्ट्र सरकारने ५० टक्के शुल्क आकारणीचा आदेश काढला तर पालकांना दिलासा मिळेल, असे आवाहन आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी केले.

आंदाेलनाला विदर्भ पेरेंट्स एसोसिएशन, जय जवान जय किसान संघटना, आम आदमी पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, लोकभारती, जागरूक पालक परिषद व लोकजागृती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आदी संघटनांनी समर्थन देत सहभाग घेतला. दिल्ली सरकारप्रमाणे फी कमी करण्याचे अध्यादेश काढावेत आणि विदर्भात तातडीने डीएफआरसीचे गठन करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. यावेळी भवानीप्रसाद चाैबे, वंचितचे रवी शेंडे, पालक संघटनेचे अजय ताजने, गुल्हाने, याेगेश मानके, प्रशांत नाइक, मंगला गजभिये, मयुरी टेंभरे, फुलचंद नागले, अनुज जैन, अरुण वनकर, ॲड. नीरज खांदेवाले, कविता हिंगल, रमन सेनाड, नरेंद्र तभाने, अशोक मिश्रा, कृतल वेळेकर, पीयूष आखरे, गिरीश तितरमारे, प्रतीक बावनकर, विकास घरडे, नवनीत बेलसरे, विश्वजित मसराम, सुरेश चतुर्वेदी, भूषण ढाकूलकर, विशाल पटले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.