शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

बोंड अळीच्या प्रकोपाने आठ तालुके प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 4:13 AM

नागपूर : कापूस वेचणीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात या अळीचा प्रभाव ...

नागपूर : कापूस वेचणीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात या अळीचा प्रभाव दिसून येत आहे. ४००० हेक्टरच्या वर कापूस बोंड अळीच्या प्रभावाखाली असून हे प्रमाण ५ ते ७ टक्के असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. विभागाने शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचा भरोसा दिला असला तरी हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिंता त्यांना आहे.

गेल्या काही वर्षांपासून बोंडअळीमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. यंदासुध्दा बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विभागाच्या मते प्रकोपचे प्रमाण कमी असले तरी ते वाढले आहे. यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे यापूर्वीच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहेत. एकंदरीत जिल्ह्यात ५४ हजार २०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये सर्वाधिक ३४ हजार ९६२ हेक्टरवरचे नुकसान हे कापसाचे आहे. जिल्ह्यात कापसाची एकूण २ लाख ११ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यानंतर कसाबसा पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक कापणीवर आले असताना अचानक झालेल्या अवकाळी (परतीच्या) पावसाने होते नव्हते सारे उद्‌ध्वस्त करून सोडले. यात कपाशीचे सर्वाधिक नुकसान होते. त्यातून शेतकऱ्यांनी हाती आली तेवढी कपाशी पहिल्या व दुसऱ्या वेचणीत काढली होती तर तिसऱ्या व चौथ्या वेचणीची कपाशी शेतात असताना आता पुन्हा बोंडअळीने हल्ला चढविला आहे. याशिवाय भिवापूर तालुक्यातील नक्षी व पुल्लर या गावातील पिकांवर तुडतुड्यांनी हल्ला चढविला आहे.

या तालुक्यातील गावांमध्ये नुकसान

कृषी विभागाच्या सर्वेक्षण मोहिमेतर्गत जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील हाथला, रिधोरा, सावली (खु.), कोहळा, जुनेवाणी, मूर्ती, पांजरा, दिग्रस व गोंडीमोहगाव, नागपूर तालुक्यातील रूई व वराडा, उमरेड तालुक्यातील कावडापूर, गरमसूर, खैरी, मुरझडी व सूरजपूर, हिंगण्यातील कोटेवाडा, शिवमडका, खडकी व लखमपुरी, भिवापूरमधील बोटेझरी, नखी, बेसूर व चोरविहिरा, कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव व पोहगोंडी, नरखेडमधील भारसिंगी व सावनेर तालुक्यातील शेरडी या गावांमध्ये कापसावरील गुलाबी बोंडअळी ही आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्याचे आढळून आले आहे. जवळपास ४ ते ६ हजार हेक्टरमधील कापसावर अळीचा प्रकोप असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. इतर तालुक्यात बोंडअळी आटोक्यात असल्याचा दावा कृषी विभागने सर्वेक्षणातून केला आहे.