शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद, पुण्याच्या बसमध्ये केवळ १५ प्रवासीच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे प्रवासी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम पडला आहे. जिल्ह्याबाहेर जाणेही प्रवाशांनी ...

नागपूर : कोरोनामुळे प्रवासी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम पडला आहे. जिल्ह्याबाहेर जाणेही प्रवाशांनी कमी केल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यात पुणे आणि औरंगाबादला जाणाऱ्या बसमध्ये केवळ १५ प्रवासीच मिळत असल्याची स्थिती आहे.

मुख्यालयातून जातात ५५० फेऱ्या

नागपूर शहरात गणेशपेठ आगारातून पूर्वी ११५० फेऱ्या नियमित सोडण्यात येत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांनी प्रवास टाळणे सुरु केल्यामुळे आता केवळ ५५० फेऱ्या सोडण्यात येत आहेत. ११५० फेऱ्या असताना २५ हजार प्रवासी प्रवास करायचे. परंतु फेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे प्रवाशांची संख्या केवळ १२ हजारावर आली आहे.

पुणे, औरंगाबादच्या बसमध्ये प्रवासी कमी

कोरोनाच्या पूर्वी पुण्यासाठी ६ बसेस सोडण्यात येत होत्या. परंतु प्रवाशांची संख्या घटल्यामुळे एसटी महामंडळाने पुण्याला जाणाऱ्या ४ बसेस बंद केल्या. सध्या दोनच बसेस पुण्याला जातात. औरंगाबादलाही जाणाऱ्या ६ बसेसपैकी ४ बसेस बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे पुणे आणि औरंगाबादच्या बसेसमध्ये केवळ १४ ते १५ प्रवासीच मिळत आहेत.

या मार्गावर आहे गर्दी

नागपूरवरून सद्यस्थितीत मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दी आहे. परंतु मध्य प्रदेश शासनाने सीमा बंद केल्यामुळे मध्य प्रदेशात जाणारे प्रवासी देवरी, गोंदियापर्यंत जात असून एका बसमध्ये २२ प्रवासी मिळत आहेत तर नागपूरवरून अमरावतीला जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. परंतु पुणे, औरंगाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड या मार्गावर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असून एका बसमध्ये केवळ १५ प्रवासीच मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नाईट आऊट बसेसला प्रतिसाद नाही

रात्री मुक्कामी जाणाऱ्या (नाईट आऊट) बसेस पूर्वी २३ सोडण्यात येत होत्या. अंबेजोगाई, पुसद, वाशिम, नांदेड, पंढरपूर, सोलापूर, अकोला, राजनांदगाव, शिवनी, मोहगाव, लोधीखेडा आणि विविध जिल्ह्याच्या ठिकाणी या बसेस जात होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटल्यामुळे आता केवळ १३ बसेस सोडण्यात येत आहेत. या १३ बसेसमध्येही प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून एका बसमध्ये १५ ते १६ प्रवासीच मिळत असल्याची स्थिती आहे.

जिल्ह्याबाहेर जाणारे प्रवासी झाले कमी

कोरोनाच्या पूर्वी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या २० हजाराच्या आसपास होती. परंतु कोरोनामुळे प्रवासी जिल्ह्याबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या १० हजारावर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढेपर्यंत फेऱ्यांची संख्या न वाढविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

गरजेनुसार बसेस सोडण्यात येतात

‘कोरोनामुळे एसटी बसेसमधील प्रवाशांची संख्या कमी झाली असून गरजेनुसार बसेस सोडण्यात येत आहेत. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पूर्ववत बसेस सुरु करण्यात येतील.’

-अनिल आमनेरकर, आगारप्रमुख, गणेशपेठ आगार

...................