शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी रजेवर, गुन्हेगार कामावर !

By admin | Updated: May 27, 2015 02:51 IST

‘गुन्हेगारांच्या मोकाटीकरणा’मागचे कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस दलातील अनेकांशी चर्चा केली असता अनेक मुद्दे पुढे आले.

गुन्हेगाराचा थयथयाट : सर्वसामान्य दहशतीत नरेश डोंगरे नागपूरपोलीस अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्याचे नाव घेतले जात नसतानाच अनेक ठाणेदारांसह वरिष्ठ पोलीस अधिकारीही सुट्यांवर गेल्यामुळे उपराजधानीत गुन्हेगारांनी थयथयाट सुरू केला आहे. खून, खुनाचे प्रयत्न, लुटमार, खंडणी वसुली, जबरी चोऱ्या, घरफोड्याच नव्हे तर बलात्कार, सामूहिक बलात्कार अन् विनयभंगांच्या घटनांनी या आठवड्यात सर्वसामान्यांसोबत पोलीसांमध्येही खळबळ उडवून दिली आहे. गेल्या सात दिवसात अचानक गुन्हेगारी उफाळून आली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, लुटमार, घरफोड्या, जबरी चोऱ्या, बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात अचानक वाढ झाली आहे. अवघ्या १७ तासात खुनाच्या तीन घटना घडल्या तर, आठ दिवसांच्या कालावधीत प्राणघातक हल्ल्याच्या १० घटना घडल्या. एकाच दिवशी कळमन्यात पेट्रोल पंपावर आणि प्रतापनगरात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याकडे पिस्तुलाच्या धाकावर करण्यात आलेल्या लुटमारीसह एकूण १० लुटमारीच्या घटना घडल्या. प्रतापनगर आणि इमामवाड्यातील सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांसह बलात्काराच्या एकूण सात घटना घडल्या. याच कालावधीत विनयभंगाच्या १० घटना पोलीस ठाण्यात नोंदल्या गेल्या. घरफोडी, चोरी, फसवणूक, खंडणी वसुलीचे गुन्हे वेगळेच आहे. उफाळलेल्या या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दुसरीकडे शहरातील इमामवाडा, सदर, सक्करदरा, जरीपटकासह अनेक ठिकाणचे ठाणेदार, एसीपी आणि दोन डीसीपी, जॉर्इंट सीपी सुटीवर गेले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात बऱ्यापैकी अधिकारी, कर्मचारी, त्यांच्यासाठी आवश्यक साधन सुविधा उपलब्ध असताना गुन्हेगारीने उसळी मारण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारला जात आहे.गुन्हेगारांकडे पोलिसांचे दुर्लक्षनागपूर : ‘गुन्हेगारांच्या मोकाटीकरणा’मागचे कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस दलातील अनेकांशी चर्चा केली असता अनेक मुद्दे पुढे आले. पोलीस अधिकाऱ्यांची रजा, पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनास्था तसेच निष्क्रियता आणि बाहेरच्या गुन्हेगारांकडील दुर्लक्ष हे काही प्रमुख मुद्दे अधोरेखित झाले. बाहेरच्यांवर दुर्लक्ष हवे !उपराजधानीतील ४ लाख गुन्ह्यांचा डाटा शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आला असून, प्रत्येक गुन्हेगारावर नजर ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी पहिल्याच आठवड्यात सांगितले होते. मात्र, ३० लाख लोकसंख्येच्या उपराजधानीत रोजगाराच्या शोधात येणाऱ्यांपैकी किती जणांवर पोलिसांची नजर आहे, ते कळायला मार्ग नाही. बाहेरून येणारे अनेक जण व्यसनाधिनतेमुळे किंवा पैशाच्या लालसेपोटी गुन्हेगारीकडे वळतात. रोजगारांच्याच नव्हे तर शिक्षणाच्याही नावाखाली आलेलेही अनेक जण गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे यापुर्वी उघड झालेले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर नजर रोखल्यास अनेक गुन्ह्यांचा उलगडा होऊ शकतो. शिवाय, पुढे घडू पाहणाऱ्या गुन्ह्यांनाही आळा घातला जाऊ शकतो. पोलीस दलातही अस्वस्थताउफाळलेल्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर वरिष्ठ पोलीस अधिकारीही अस्वस्थ आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात बऱ्यापैकी मनुष्यबळ, चांगली अन् पुरेशी वाहने तसेच सुविधा देऊनही गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात अपयश का येत आहे, त्याबाबत पोलीस दलात जोरदार मंथन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी सोमवारी सर्व ठाणेदारांचा क्लास घेतला. मंगळवारी सकाळपासूनच पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्या दालनात दुपारपासून सायंकाळपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली तर, त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे अतिरिक्त आयुक्तांची प्रदीर्घ बैठक झाली. गुन्हे आणि पोलिसांची भूमिका यावर अधिकाऱ्यांनी चिंतन केले. (प्रतिनिधी)