शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

शेतकऱ्यांची सीमा तपासणी नाक्यावर अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:54 IST

नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे.

ठळक मुद्देऐन हंगामात शेतकऱ्यांपुढे संकट : काम बुडवून रोज कसा काढायचा पास, शेतकरी म्हणतात दैनिकऐवजी मासिक पास द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे. नागपूर जिलहधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन शेतकऱ्यांना पासची मागणी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र लगतच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे शेतकऱ्यांपुढे प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामामध्ये शेतावर रोजच जाणे आवश्यक असते. त्यामुळे दैनिक पासऐवजी मासिक पास देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे या तालुक्यातील नंदपूर या गावामध्ये शेती असणाऱ्या शेतकऱ्याने ही व्यथा ‘लोकमत’कडे व्यक्त केली. हा शेतकरी नागपुरात वास्तव्यास असून शेती वर्धा जिल्ह्यात आहे. पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामात शेतावर रोज जाणे आवश्यक असते. मात्र वर्धा जिल्ह्यातील नाक्यावरील पोलीस आणि अधिकारी पास आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मागतात. यामुळे रोज पास काढण्यासाठी वेळ खर्च करणे तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येणारा खर्चही रोज उचलणे कसे शक्य आहे, असा या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अनेक शेतकरी वर्ध्यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून शेती करतात. इतर वेळी सालगडी यांच्या भरवशावर काम करता येईल, मात्र पेरणीसारखा हंगाम डोळ्याआड कसा करायचा, हा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.नागपूरलगत असलेल्या वर्ध्यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही असाच प्रश्न आहे. भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढेही सर्वाधिक समस्या आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाअंतर्गत मार्गाचा अवलंब करणे सुरू केला आहे. मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण कायमच आहे. तालुकास्थळावरून कुठे ५ तर कुठे १५ किलोमीटर अंतरावर दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमा सुरू होतात. त्याच्याही पलीकडे दूर अंतरावर शेती असल्याने हा अडचणीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, नीलज, आमगाव, निष्टी, भुयार, तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, चिमूर, कोलारी, साठगाव, शंकरपूर, जवराबोडी, भिसी हा परिसर तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, धामणगाव हा परिसर भिवापूर तालुक्याला अगदी खेटून आहे. हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती सेलू, सिंदी रेल्वे या तालुक्यांमध्ये आहे. बुटीबोरीहून अनेक शेतकरी समुद्रपूर तालुक्यात शेती करतात.सातबारा दाखवूनही समाधान नाहीनाक्यावरील अधिकाऱ्यांना शेतीचा सातबारा दाखवूनही समाधान होत नाही. पासची मागणी केली जाते. नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने या शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आता बदलला आहे. परिणामत: पोलिसांकडून आणि नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून अपमानित होण्यात घडत असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. त्यामुळे कामे बुडवून दररोज परवानगी कशी आणायची, असा या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.आम्हा शेतकऱ्यांसाठी पेरणीचा हंगाम महत्त्वाचा असतो. हा वेळ वाया गेला तर त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. आमची शेती वर्धा जिल्ह्यात आहे. मात्र तेथील नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून पाससाठी अडवणूक केली जाते. रोज पास काढणे शक्य नाही.- राजू मांडवकर, शेतकरी, बेलतरोडी

टॅग्स :Farmerशेतकरी