शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

शेतकऱ्यांची सीमा तपासणी नाक्यावर अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:54 IST

नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे.

ठळक मुद्देऐन हंगामात शेतकऱ्यांपुढे संकट : काम बुडवून रोज कसा काढायचा पास, शेतकरी म्हणतात दैनिकऐवजी मासिक पास द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे. नागपूर जिलहधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन शेतकऱ्यांना पासची मागणी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र लगतच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे शेतकऱ्यांपुढे प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामामध्ये शेतावर रोजच जाणे आवश्यक असते. त्यामुळे दैनिक पासऐवजी मासिक पास देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे या तालुक्यातील नंदपूर या गावामध्ये शेती असणाऱ्या शेतकऱ्याने ही व्यथा ‘लोकमत’कडे व्यक्त केली. हा शेतकरी नागपुरात वास्तव्यास असून शेती वर्धा जिल्ह्यात आहे. पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामात शेतावर रोज जाणे आवश्यक असते. मात्र वर्धा जिल्ह्यातील नाक्यावरील पोलीस आणि अधिकारी पास आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मागतात. यामुळे रोज पास काढण्यासाठी वेळ खर्च करणे तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येणारा खर्चही रोज उचलणे कसे शक्य आहे, असा या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अनेक शेतकरी वर्ध्यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून शेती करतात. इतर वेळी सालगडी यांच्या भरवशावर काम करता येईल, मात्र पेरणीसारखा हंगाम डोळ्याआड कसा करायचा, हा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.नागपूरलगत असलेल्या वर्ध्यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही असाच प्रश्न आहे. भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढेही सर्वाधिक समस्या आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाअंतर्गत मार्गाचा अवलंब करणे सुरू केला आहे. मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण कायमच आहे. तालुकास्थळावरून कुठे ५ तर कुठे १५ किलोमीटर अंतरावर दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमा सुरू होतात. त्याच्याही पलीकडे दूर अंतरावर शेती असल्याने हा अडचणीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, नीलज, आमगाव, निष्टी, भुयार, तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, चिमूर, कोलारी, साठगाव, शंकरपूर, जवराबोडी, भिसी हा परिसर तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, धामणगाव हा परिसर भिवापूर तालुक्याला अगदी खेटून आहे. हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती सेलू, सिंदी रेल्वे या तालुक्यांमध्ये आहे. बुटीबोरीहून अनेक शेतकरी समुद्रपूर तालुक्यात शेती करतात.सातबारा दाखवूनही समाधान नाहीनाक्यावरील अधिकाऱ्यांना शेतीचा सातबारा दाखवूनही समाधान होत नाही. पासची मागणी केली जाते. नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने या शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आता बदलला आहे. परिणामत: पोलिसांकडून आणि नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून अपमानित होण्यात घडत असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. त्यामुळे कामे बुडवून दररोज परवानगी कशी आणायची, असा या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.आम्हा शेतकऱ्यांसाठी पेरणीचा हंगाम महत्त्वाचा असतो. हा वेळ वाया गेला तर त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. आमची शेती वर्धा जिल्ह्यात आहे. मात्र तेथील नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून पाससाठी अडवणूक केली जाते. रोज पास काढणे शक्य नाही.- राजू मांडवकर, शेतकरी, बेलतरोडी

टॅग्स :Farmerशेतकरी