शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

शेतकऱ्यांची सीमा तपासणी नाक्यावर अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:54 IST

नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे.

ठळक मुद्देऐन हंगामात शेतकऱ्यांपुढे संकट : काम बुडवून रोज कसा काढायचा पास, शेतकरी म्हणतात दैनिकऐवजी मासिक पास द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे. नागपूर जिलहधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन शेतकऱ्यांना पासची मागणी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र लगतच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे शेतकऱ्यांपुढे प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामामध्ये शेतावर रोजच जाणे आवश्यक असते. त्यामुळे दैनिक पासऐवजी मासिक पास देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे या तालुक्यातील नंदपूर या गावामध्ये शेती असणाऱ्या शेतकऱ्याने ही व्यथा ‘लोकमत’कडे व्यक्त केली. हा शेतकरी नागपुरात वास्तव्यास असून शेती वर्धा जिल्ह्यात आहे. पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामात शेतावर रोज जाणे आवश्यक असते. मात्र वर्धा जिल्ह्यातील नाक्यावरील पोलीस आणि अधिकारी पास आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मागतात. यामुळे रोज पास काढण्यासाठी वेळ खर्च करणे तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येणारा खर्चही रोज उचलणे कसे शक्य आहे, असा या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अनेक शेतकरी वर्ध्यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून शेती करतात. इतर वेळी सालगडी यांच्या भरवशावर काम करता येईल, मात्र पेरणीसारखा हंगाम डोळ्याआड कसा करायचा, हा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.नागपूरलगत असलेल्या वर्ध्यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही असाच प्रश्न आहे. भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढेही सर्वाधिक समस्या आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाअंतर्गत मार्गाचा अवलंब करणे सुरू केला आहे. मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण कायमच आहे. तालुकास्थळावरून कुठे ५ तर कुठे १५ किलोमीटर अंतरावर दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमा सुरू होतात. त्याच्याही पलीकडे दूर अंतरावर शेती असल्याने हा अडचणीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, नीलज, आमगाव, निष्टी, भुयार, तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, चिमूर, कोलारी, साठगाव, शंकरपूर, जवराबोडी, भिसी हा परिसर तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, धामणगाव हा परिसर भिवापूर तालुक्याला अगदी खेटून आहे. हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती सेलू, सिंदी रेल्वे या तालुक्यांमध्ये आहे. बुटीबोरीहून अनेक शेतकरी समुद्रपूर तालुक्यात शेती करतात.सातबारा दाखवूनही समाधान नाहीनाक्यावरील अधिकाऱ्यांना शेतीचा सातबारा दाखवूनही समाधान होत नाही. पासची मागणी केली जाते. नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने या शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आता बदलला आहे. परिणामत: पोलिसांकडून आणि नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून अपमानित होण्यात घडत असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. त्यामुळे कामे बुडवून दररोज परवानगी कशी आणायची, असा या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.आम्हा शेतकऱ्यांसाठी पेरणीचा हंगाम महत्त्वाचा असतो. हा वेळ वाया गेला तर त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. आमची शेती वर्धा जिल्ह्यात आहे. मात्र तेथील नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून पाससाठी अडवणूक केली जाते. रोज पास काढणे शक्य नाही.- राजू मांडवकर, शेतकरी, बेलतरोडी

टॅग्स :Farmerशेतकरी