शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आता विषयनिहाय लोकअदालती

By admin | Updated: February 4, 2015 00:57 IST

राष्ट्रीय विधिसेवा आणि राज्य विधिसेवा प्राधिकरणाच्या निर्देशान्वये १४ फेब्रुवारीपासून विषयनिहाय लोकअदालतींचे आयोजन करण्यात येत असून, २५ ते ३० हजार प्रकरणे निकाली

२५ हजारांवर प्रकरणे निकाली निघणारनागपूर : राष्ट्रीय विधिसेवा आणि राज्य विधिसेवा प्राधिकरणाच्या निर्देशान्वये १४ फेब्रुवारीपासून विषयनिहाय लोकअदालतींचे आयोजन करण्यात येत असून, २५ ते ३० हजार प्रकरणे निकाली निघण्याची शक्यता आहे. ही माहिती मंगळवारी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली. १४ फेब्रुवारी रोजी बँक प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, १४ मार्च रोजी महसूल, ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भूसंपादन प्रकरणे, ११ एप्रिल रोजी कामगार आणि कौटुंबिक प्रकरणे, १३ जून रोजी मोटार अपघात दावा आणि विमा दावा प्रकरणे, ११ जुलै रोजी विद्युत, पाणी, दूरध्वनी आणि सार्वजनिक सेवा प्रकरणे, ८ आॅगस्ट रोजी ग्राहक विवाद आणि कर विवाद प्रकरणे, १२ सप्टेंबर रोजी समझोतायोग्य फौजदारी प्रकरणे आणि १० आॅक्टोबर रोजी वाहतूक, क्षुल्लक प्रकरणे व महानगरपालिका प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. या विषयनिहाय लोकअदालतीत त्या त्या विषयाच्या तज्ज्ञ समित्या राहणार आहेत. त्यामुळे संबंधित आणि गरजू पक्षकारांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)७६ वादपूर्व दावे निकालीजिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्याच वतीने जिल्हा न्यायालयात शुक्रवारी पार पडलेल्या विशेष लोकअदालतमध्ये २०० वादपूर्व दाव्यांपैकी ७६ दावे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आल्याचीही माहिती जयस्वाल यांनी दिली. या विशेष लोकअदालतच्या पॅनलचे प्रमुख सेवानिवृत्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डब्ल्यू. व्ही. गुघाणे होते.