शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतच उडवून देण्याचा नक्षल्यांचा होता कट

By admin | Updated: May 14, 2014 14:17 IST

मुक्कामाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून पोलिसांना झोपेतच उडवून देण्याची माओवाद्याची योजना होती. मात्र, ‘तेथे‘ स्फोट घडविल्यास चोहोबाजूने टीका होईल, याची ...

 ऐनवेळी बदल : पोलिसांवर होती सूक्ष्म नजर

 

 

मुक्कामाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून पोलिसांना झोपेतच उडवून देण्याची माओवाद्याची योजना होती. मात्र, ‘तेथे‘ स्फोट घडविल्यास चोहोबाजूने टीका होईल, याची कल्पना आल्यामुळे माओवाद्यांनी बॉम्ब फेकण्याऐवजी सुरुंगस्फोट घडवून आणला, अशी खळबळजनक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. ‘लोकल‘ नाहीत. त्यामुळे ही स्फोटके नक्षल्यांना कुणी पुरवली, त्याची आता माहिती घेतली जात आहे. या एकूणच माहितीची शहानिशा करण्यासाठी गडचिरोली परिक्षेत्राचे डीआयजी रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याकडे विचारणा केली असता, चौकशी सुरू असल्यामुळे तूर्त काही बोलणे योग्य होणार नसल्याचे ते म्हणतात.

 

गडचिरोली जिल्ह्यातील मुरमुरी (ता. चामोर्शी) गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवून नक्षल्यांनी रविवारी सकाळी पोलिसांचे वाहन उडवून दिले. या स्फोटात सात पोलीस शहीद झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटाचे सर्वत्र कवित्व सुरू आहे.

 

हा स्फोट कुणी घडविला, कसा घडविला, पोलिसांनी हलगर्जीपणा केला का, येथपासून तो राजकारण्यांची अनास्था आणि या स्फोटानंतर त्यांनी दाखविलेला निगरगट्टपणा या मुद्यांपर्यंत चर्चेचा बाजार गरम आहे. स्फोट घडवून पोलिसांचे बळी घेणार्‍या माओवाद्यांचा तपास लावण्यात पोलीस अधिकारी गुंतले आहे. या पार्श्‍वभूमीवर, संबंधित सूत्रांचा कानोसा घेतला असता अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली.

 

त्यानुसार, स्फोटात शहीद आणि जखमी झालेले सी-६0 पथकाचे जवान नक्षलवाद्यांना हुडकून काढण्यासाठी तीन ते चार दिवसांपासून जंगलात पायपीट करीत होते. सुमारे १00 किलोमीटर जंगल तुडविल्यानंतर पोलीस पार्टीला तर नक्षलवाद्यांचा मागमूस लागला नाही.

 

नक्षलवाद्यांची मात्र या पोलिसांवर सूक्ष्म नजर होती. ते कुठून आले, कुठे थांबले, कधी आणि कोणत्या रस्त्याने परत जाणार, हे नक्षल्यांनी हेरले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पोलिसांनी मुरमुरी गावाजवळच्या शाळेत मुक्काम ठोकला. त्याचा नक्षल्यांना सुगावा लागला. त्यामुळे तेथे स्फोट घडवून झोपेतच पोलिसांचा बळी घेण्याचा कट नक्षल्यांनी रचला. मात्र, शाळेत स्फोट घडविल्यास सामाजिक परिणाम वाईट होतील. कोणत्याच घटकांकडून सर्मथन तर सोडा सहानुभूती मिळणार नाही, याची कल्पना आल्यामुळे नक्षल्यांनी पोलिसांवर बॉम्ब फेकण्याच्या योजनेत बदल केला. त्यांनी रात्रीतूनच पोलीस परत जाणार्‍या मार्गावर स्फोटके पेरली अन् स्फोट घडवून आणला. या कटातून नक्षल्यांनी आपले इप्सित साध्य केले.

 

स्फोटके कुणी पुरवली ?

 

सात पोलिसांचे बळी घेणार्‍या घटनेत नक्षल्यांनी जी स्फोटके वापरली, ती

 

नक्षलवादी पोलिसांच्या मागे अन् पुढेही !

 

पोलीस नक्षलवाद्यांना हुडकून काढण्यासाठी त्यांच्या नेहमी मागे असतात असे समजले जाते. मात्र, मुरुमुरीच्या स्फोटानंतर नक्षलवादी पोलिसांच्या मागे असतात. ते त्यांच्या हालचालीची पूर्णपणे माहिती ठेवतात अन् संधी साधून त्यांचे बळीही घेतात, हे पुन्हा एकदा या स्फोटाच्या घटनेने स्पष्ट केले आहे.