शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

नागपुरात टिप्परने दोन सख्ख्या बहिणींना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:45 IST

अ‍ॅक्टिव्हाने दूध आणायला जात असलेल्या दोन तरुण बहिणींना टिप्परने चिरडले. या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली.

ठळक मुद्देभंडारा मार्गावरील पारडीतील घटना : परिसरात तणाव पोलीस-मेट्रोविरुद्ध तीव्र संताप,  नागरिकांनी घातला गोंधळ 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्टिव्हाने दूध आणायला जात असलेल्या दोन तरुण बहिणींना टिप्परने चिरडले. या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली. 

लक्ष्मी रमाशंकर शाहू (२१) व आँचल रमाशंकर शाहू (१९) रा. प्लॉट नं. १९६ जयदुर्गा शंकर किराणाजवळ बीडगाव, अशी मृत बहिणींची नावे आहेत.  मृत बहिणींचे वडील रमाशंकर शाहू यांचे घरीच किराणा दुकान आहे. दोन्ही बहिणी आईवडिलांना कामात मदत करायच्या. आचल महाविद्यालयात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती तर लक्ष्मी हिने अकरावीनंतरच शिक्षण सोडले होते. साहू यांची मोठी मुलगी ज्योती हिचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. सर्वात लहान मुलगी चंचल अकरावीची विद्यार्थिनी आहे. शाहू आपल्या किराणा दुकानात दूध विक्रीही करतात. दुकानासाठी लागणारे दूध सर्वात लहान मुलगी चंचल ही नेहमीच भवानीनगर येथील एका दुकानातून आणायची कधी-कधी आचल व लक्ष्मीसुद्धा दूध आणायला जात असत. बुधवारी सुद्धा दोघीही दूध आणायला भवानी नगरला गेल्या होत्या.  सकाळी ७.१५ वाजता दोन्ही बहिणी दूध घेऊन अ‍ॅक्टीव्हाने घराकडे परत जात होत्या. आचल गाडी चालवित होती. दोघी पारडी बाजार चौक ओलांडून भांडेवाडी मार्गाकडे जात होत्या. त्याच वेळी भंडारा रोडच्या दिशेकडून वाळूने भरलेला टिप्पर (क्र. एम.एच./४०/ए.के.१००८) भरधाव वेगाने आला. त्याने अ‍ॅक्टीव्हाला धडक दिली. त्यावेळी पारडी चौकात चांगलीच वर्दळ होती. धडकेचा आवाज ऐकून लोकांनी टिप्पर चालकास गाडी रोखण्यासाठी आवाज दिला. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. टिप्पर चालकाने अ‍ॅक्टीव्हास्वार बहिणींना तब्बल ८० फूटापर्यंत चिरडत नेले. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक जाम केली. वाहतूक पोलीस आणि मेट्रो रेल्वेचे संथगतीने सुरू असलेल्या कामामुळेच हा अपघात झाल्याचे लोकांचे म्हणणे होते. मेट्रोच्या कामामुळे येथील वाहतूक प्रभावित होते. ऑटोचालक रस्त्यावर ठाण मांडून असतात. वाहतूक पोलीस रस्त्याच्या बाजूला उभे असतात. परंतु कुठलीही कारवाई करीत नाही. मेट्रो प्रशासन व वाहतूक पोलिसांना अनेकदा याची तक्रार सुद्धा करण्यात आली. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही.  घटनेची माहिती होताच कळमना पोलीस तगड्या बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसंनी कसेबसे लोकांना शांत करीत मृतदेह मेयोला रवाना केले. या घटनेमुळे पोलिसांच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे सांगितले जाते की, वाळूने भरलेला टिप्पर ओव्हरलोड होता. तो भरधाव वेगाने जात होता. टिप्पर चालकांना जास्तीत जास्त फेºया करण्यासाठी बक्षिस दिले जाते. यामुळे ते अनियंत्रितपणे वाहने चालवतात. अवैध रेती वाहतूक शहरात नेहमीच चर्चेता विषय राहिला आहे. याला प्रशासन व पोलिसांचेही आश्रय आहे. यात दिग्गन नेतेही सहभागी आहे. त्यामुळे सर्वच आपले डोळे मिटवून घेतात. १५ दिवसांपूर्वी वळू माफियाने नंदनवन येथील नायब तहसीलदारावर हल्ला केला होता. याचा सूत्रधार अजुनही पकडला गेला नाही. यापूर्वी सुद्धा वाळू माफियाने पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले केलेले आहे. या अपघातात जप्त टिप्परही ओव्हरलोड होता. यानंतरही तो सहजपणे शहरात दाखल झाला.  या अपघातामुळे शाहू परिवार प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. रमाशंकर यांचे कुटुंबीय मुळचे अलाहाबाद येथील राहणारे आहेत. त्यांची पत्नी अलाहाबादला गेली आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

 पोलीस-मेट्रोचा निष्काळजीपणा या परिसरातील नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी सांगितले की, पोलीस आणि मेट्रोच्या निष्काळजीपणामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. वाहतूक पोलीस केवळ शोभेचे बाहुले बनून उभे असतात. त्यांनी अनेकदा अपघात रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. परंतु काहीह लक्ष दिले गेले नाही. अपघात झाल्यानंतर दोन-तीन दिवस अधिकारी येऊन पाहतात. त्यानंतर सर्वकाही जैसे थे होते. 

विरोध केल्यावर कारवाई   नगरसेविका जयश्री लारोकर यांचे पती योगेश्वर लारोकर यांनी सांगितले की वाहतूक व्यवस्था योग्यपणे सांभाळण्याचा सल्ला देणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलीस कारवाई करतात.  सहा महिन्यांपूर्वी अपघात करून पळून जात असलेल्या एका वाहन चालकाविरुद्ध कारवाई न केल्याबद्दल वाहतूक पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच विरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सामाकि कार्यकर्ता म्हणून त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की, त्यांना १० दिवस न्यायालयीन तुरुंगात राहावे लागले होते. नागरिक आवाज उचलणार नाही तर असे अपघात होतच राहतील. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू