शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुरात टिप्परने दोन सख्ख्या बहिणींना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:45 IST

अ‍ॅक्टिव्हाने दूध आणायला जात असलेल्या दोन तरुण बहिणींना टिप्परने चिरडले. या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली.

ठळक मुद्देभंडारा मार्गावरील पारडीतील घटना : परिसरात तणाव पोलीस-मेट्रोविरुद्ध तीव्र संताप,  नागरिकांनी घातला गोंधळ 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्टिव्हाने दूध आणायला जात असलेल्या दोन तरुण बहिणींना टिप्परने चिरडले. या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली. 

लक्ष्मी रमाशंकर शाहू (२१) व आँचल रमाशंकर शाहू (१९) रा. प्लॉट नं. १९६ जयदुर्गा शंकर किराणाजवळ बीडगाव, अशी मृत बहिणींची नावे आहेत.  मृत बहिणींचे वडील रमाशंकर शाहू यांचे घरीच किराणा दुकान आहे. दोन्ही बहिणी आईवडिलांना कामात मदत करायच्या. आचल महाविद्यालयात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती तर लक्ष्मी हिने अकरावीनंतरच शिक्षण सोडले होते. साहू यांची मोठी मुलगी ज्योती हिचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. सर्वात लहान मुलगी चंचल अकरावीची विद्यार्थिनी आहे. शाहू आपल्या किराणा दुकानात दूध विक्रीही करतात. दुकानासाठी लागणारे दूध सर्वात लहान मुलगी चंचल ही नेहमीच भवानीनगर येथील एका दुकानातून आणायची कधी-कधी आचल व लक्ष्मीसुद्धा दूध आणायला जात असत. बुधवारी सुद्धा दोघीही दूध आणायला भवानी नगरला गेल्या होत्या.  सकाळी ७.१५ वाजता दोन्ही बहिणी दूध घेऊन अ‍ॅक्टीव्हाने घराकडे परत जात होत्या. आचल गाडी चालवित होती. दोघी पारडी बाजार चौक ओलांडून भांडेवाडी मार्गाकडे जात होत्या. त्याच वेळी भंडारा रोडच्या दिशेकडून वाळूने भरलेला टिप्पर (क्र. एम.एच./४०/ए.के.१००८) भरधाव वेगाने आला. त्याने अ‍ॅक्टीव्हाला धडक दिली. त्यावेळी पारडी चौकात चांगलीच वर्दळ होती. धडकेचा आवाज ऐकून लोकांनी टिप्पर चालकास गाडी रोखण्यासाठी आवाज दिला. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. टिप्पर चालकाने अ‍ॅक्टीव्हास्वार बहिणींना तब्बल ८० फूटापर्यंत चिरडत नेले. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक जाम केली. वाहतूक पोलीस आणि मेट्रो रेल्वेचे संथगतीने सुरू असलेल्या कामामुळेच हा अपघात झाल्याचे लोकांचे म्हणणे होते. मेट्रोच्या कामामुळे येथील वाहतूक प्रभावित होते. ऑटोचालक रस्त्यावर ठाण मांडून असतात. वाहतूक पोलीस रस्त्याच्या बाजूला उभे असतात. परंतु कुठलीही कारवाई करीत नाही. मेट्रो प्रशासन व वाहतूक पोलिसांना अनेकदा याची तक्रार सुद्धा करण्यात आली. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही.  घटनेची माहिती होताच कळमना पोलीस तगड्या बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसंनी कसेबसे लोकांना शांत करीत मृतदेह मेयोला रवाना केले. या घटनेमुळे पोलिसांच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे सांगितले जाते की, वाळूने भरलेला टिप्पर ओव्हरलोड होता. तो भरधाव वेगाने जात होता. टिप्पर चालकांना जास्तीत जास्त फेºया करण्यासाठी बक्षिस दिले जाते. यामुळे ते अनियंत्रितपणे वाहने चालवतात. अवैध रेती वाहतूक शहरात नेहमीच चर्चेता विषय राहिला आहे. याला प्रशासन व पोलिसांचेही आश्रय आहे. यात दिग्गन नेतेही सहभागी आहे. त्यामुळे सर्वच आपले डोळे मिटवून घेतात. १५ दिवसांपूर्वी वळू माफियाने नंदनवन येथील नायब तहसीलदारावर हल्ला केला होता. याचा सूत्रधार अजुनही पकडला गेला नाही. यापूर्वी सुद्धा वाळू माफियाने पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले केलेले आहे. या अपघातात जप्त टिप्परही ओव्हरलोड होता. यानंतरही तो सहजपणे शहरात दाखल झाला.  या अपघातामुळे शाहू परिवार प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. रमाशंकर यांचे कुटुंबीय मुळचे अलाहाबाद येथील राहणारे आहेत. त्यांची पत्नी अलाहाबादला गेली आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

 पोलीस-मेट्रोचा निष्काळजीपणा या परिसरातील नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी सांगितले की, पोलीस आणि मेट्रोच्या निष्काळजीपणामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. वाहतूक पोलीस केवळ शोभेचे बाहुले बनून उभे असतात. त्यांनी अनेकदा अपघात रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. परंतु काहीह लक्ष दिले गेले नाही. अपघात झाल्यानंतर दोन-तीन दिवस अधिकारी येऊन पाहतात. त्यानंतर सर्वकाही जैसे थे होते. 

विरोध केल्यावर कारवाई   नगरसेविका जयश्री लारोकर यांचे पती योगेश्वर लारोकर यांनी सांगितले की वाहतूक व्यवस्था योग्यपणे सांभाळण्याचा सल्ला देणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलीस कारवाई करतात.  सहा महिन्यांपूर्वी अपघात करून पळून जात असलेल्या एका वाहन चालकाविरुद्ध कारवाई न केल्याबद्दल वाहतूक पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच विरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सामाकि कार्यकर्ता म्हणून त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की, त्यांना १० दिवस न्यायालयीन तुरुंगात राहावे लागले होते. नागरिक आवाज उचलणार नाही तर असे अपघात होतच राहतील. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू