शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अबब...नागपुरात जागोजागी अवतरल्या गोगलगायी; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:46 IST

दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे.

ठळक मुद्देकाही विषारी असण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच कोरोनाच्या धास्तीने नागरिकांना हैराण केले असताना दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे. घरात, विहिरीत, भिंतीवर, छपरावर चालणाऱ्या या गोगलगाईं अंगणात अक्षरश: खच पडलेला असतो. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने गोगलगाई दिसत असल्याने लोकांमध्ये वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण झाली आहे.

बेसा रोड, मानेवाडा भागातील गीतानगर, गजानननगर, शाहूनगर, कपिलनगर आदी वस्त्यांमधील नागरिकांना येत आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घराच दरवाजा उघडला की अंगणात या शंख असलेल्या गोगलगाईंचा सडा पडलेला असतो. घरातील महिला, मुले यांना भीती वाटत असल्याने हात लावायला तयार नसतात. त्यामुळे घरच्या पुरुषांना सकाळी उठल्यावर आधी यांना बाहेर काढण्याचे काम करावे लागते. एकएक घरातून ३०० ते ५०० गोगलगाई टोपलीने किंवा बोºयात भरून काढाव्या लागतात.

वस्तीमध्ये रिकाम्या भूखंडांवरील पाण्यात, कचºयात अगदी लाखोंच्या संख्येने त्या पसरलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी यांचा प्रादुर्भाव अधिक आहे. विहिरीच्या पाण्यात, कचºयात, गवतात त्या दिसतात. त्यामुळे पाण्यातून घाण व कुजकट दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. परिसरातील नागरिक पांडुरंग ठाणेकर यांनी सांगितले, याबाबत महापालिक, आरोग्य विभाग व प्रभागाच्या नगरसेवकांना माहिती दिली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांमध्ये असंतोष पसरला आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की गोगलगाय दिसते पण त्यांचे प्रमाण नगण्य असते. मात्र यावर्षी त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक दहशतीत जगत असताना यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने गोगलगाय का निघाल्या, या विचाराने लोकांमध्ये अनामिक भीती निर्माण झाली आहे.- ३०-४० वर्षापूर्वी येथे मानवी वस्ती नव्हती, जंगलाचा परिसर होता. त्यामुळे कदाचित गोगलगाई आल्या असाव्यात, अशी शंका आहे. मात्र यापूर्वी त्या मोठ्या संख्येने कधी दिसल्या नाही आणि यावर्षी असे चित्र दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागात दिसतात पण शहरात पहिल्यांदा मोठ्या संख्येने त्या दिसत असल्याचे बोलले जात आहे.- मीठ टाकून मारण्याचा प्रयत्नया गोगलगाईंमुळे नागरिकांना शारीरिक किंवा आजाराबाबतची कुठलीही समस्या आली नसली तरी अनामिक भीती, अस्वस्थपणा व विचित्रपणा नक्कीच अनुभवावा लागतो आहे. तक्रारीनंतरही मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी स्वत:च ब्लिचिंग पावडर किंवा फिनाईल टाकून पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र फायदा होत नसल्याने गोगलगाईंवर मीठ टाकून मारले जात आहे.- काही विषारीही असतातगोगलगाईबाबत माहिती जाणून घेतली असता, त्या ३५ हजार प्रकारच्या असल्याची माहिती मिळाली. हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो. विशिष्ट खूण ठेवण्यासाठी चिकट पदार्थ स्रवत असतात. त्यातील काही विषारी तर काही बिनविषारी असतात. शंख असलेल्या गोगलगाईंमध्येच विषारी प्रकार आढळून येतो. त्यामुळे या विषारीही असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते आपल्याकडे विषारी प्रकार आढळून येत नाही.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव