शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

प्रस्तावित वीज प्रकल्पामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:06 AM

आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा औष्णिक प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देजनमंच जनसंवादमध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भात आधीच विविध औष्णिक प्रकल्पातून १७,००० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. लोकांची गरज व मागणी नसताना १३२० मेगावॅटचा आणखी एक विद्युत प्रकल्प कोराडी येथे सुरू करण्यात येत आहे. जळणाऱ्या कोळशामुळे अत्यंत धोकादायक सल्फरडाय ऑक्साईड आणि रेडिओअ‍ॅक्टीव्ह कणांचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.जनमंचतर्फे जनसंवाद कार्यक्रमांतर्गत शनिवारी बाबुराव धनवटे सभागृहात कोराडीचा प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार काय, या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात विदर्भ पर्यावरण कृती समितीचे संयोजक सुधीर पालीवाल आणि महाविदर्भ जनजागरण समितीचे संयोजक नितीन रोंघे यांनी या प्रकल्पामुळे होणाऱ्या धोक्याचे संकेत दिले. जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप व्यासपीठावर उपस्थित होते. पालीवाल म्हणाले, जगात कुठेही नसतील एवढे वीज प्रकल्प नागपूरच्या आसपास आहेत. १० वर्षांपूर्वी हरित लवादाने प्रदूषण नियंत्रणासाठी सिस्टीम लावण्याचे निर्देश देऊनही कोराडीत ते बसविण्यात आले नाही. यामुळे अनेक आजार आणि मृत्यू ओढविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नितीन रोंघे यांनीही प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला. प्रास्ताविक राजीव जगताप यांनी तर संचालन अ‍ॅड. मनोहर रडके यांनी केले.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर