शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा

By नरेश डोंगरे | Updated: August 9, 2025 22:24 IST

व्रतस्थ वटवृक्ष देतो 'सुकून' : थकल्या-भागल्या जिवांसह हजारो पक्षांचाही आश्रयदाता 

-नरेश डोंगरे, नागपूर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे... बालपणापासून कानामनात रुंजी घालणाऱ्या या ओळी माणसाचे निसर्गाशी असलेले नाते अधोरेखित करतात. फुलं, फळं, औषधी, ऑक्सिजन, गारवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, पायाला भिंगरी बांधून भटकणाऱ्या जिवांना वृक्ष 'सुकून' देतात. त्याचमुळे अनादी कालापासून मानवी जिवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अलिकडे मात्र इंच-इंच जमिन व्यापण्याचा हव्यास जडल्याने आणि जागोजागी सिमेंटचे जंगल उभे होऊ लागल्याने अनेक वृक्ष काळाच्या ओघात हरविले. तथापि, जंगल, शेत-शिवार, खेडे-छोटी गावेच नव्हे तर अनेक महानगरातही काही वृक्ष आपल्या संपन्नतेची साक्ष पटवत असल्याचे दिसून येतात.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या कडवी चौकातील ट्रॅक मशीन परिसरात असाच एक वटवृक्ष डौलदारपणे उभा आहे. वृक्षवल्ली जोपासणाऱ्या मंडळीचा हा भव्य वटवृक्ष विविध अंगाने लाडका आहे.

सर्वसाधारण जनता या वडाच्या झाडाला दिर्घायुष्य आणि ऐक्याचे प्रतिक मानतात. ब्रिटिशपूर्व काळापासून मानव, पक्षी अशा अनेकांचा आश्रयदाता ठरलेल्या या वटवृक्षाचे वय किती असावे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही पडला होता. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या वटवृक्षाचे वय आपापल्या पद्धतीने सांगत होते. 

या पार्श्वभूमीवर, मोतीबाग दपूमरेचे वरिष्ठ विभाग अभियंता (बांधकाम) मनीष पसीने यांच्या विनंतीनुसार वनविभाग, सेमिनरी हिल्स, नागपूर यांनी या वटवृक्षाचे वय निश्चित केले आहे. त्यानुसार, अनेक पिढ्यांचा साक्षीदार असलेल्या या वटवृक्षाचे वय आहे २३३ वर्षे. होय तसे प्रमाणपत्र वनविभागाने दिल्याचा दावा दपूम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

अनेकांना वाटतो हक्काचा

भारतीय संस्कृतीत वडाचे झाड अर्थात वटवृक्ष अमरत्व, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानला जातो.असंख्य फांद्या, जटा व पसरट छत्रामुळे हा वटवृक्ष एखाद्या ऋषिमनी, तपस्व्यासारखा भासतो. 

२३ दशकांहून अधिक काळापासून पर्यावरणाचे रक्षण करतानाच उन्हाळ्यात गार सावली देणारा हा वृक्ष बाराही महिने असंख्य पक्षी, खारी तसेच अन्य जिवांना आश्रय देतो. 

थकल्या भागल्या जिवांनाही तो अगदी हक्काचा वाटतो. त्यामुळे त्याच्या संवर्धन आणि परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी वेळोवेळी अनेकजण श्रमदानही करतात.

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्सnagpurनागपूरNatureनिसर्ग