शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

शिंदेंच्या राजीनाम्यावर घुमजाव अन् दालनात वाद, उद्धव ठाकरेंच्या आग्रहाला अजित पवारांची गुगली

By यदू जोशी | Updated: December 21, 2022 08:42 IST

भूखंड मंजुरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आग्रही होते. विधानसभेत तशी मागणी करायची, असेही ठरले. पण...

यदु जोशीनागपूर : महाविकास आघाडीच्या मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत नागपुरातील एनआयटीच्या भूखंड मंजुरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आग्रही होते. विधानसभेत तशी मागणी करायची, असेही ठरले. पण प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निधीवाटपाबाबत अन्यायाचा विषय रेटला. यावरून महाविकास आघाडीतील विसंवाद दिसून आला.

त्यानंतर दीडएक तासाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्यात उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष काहीसा शाब्दिक वादही झाला. गोऱ्हे यांच्या दालनात दोघांमध्ये थोडी राजी-नाराजी दिसून आली. उद्धव ठाकरे यांनीच मग विषय संपवला.

विधानसभेचे कामकाज ११ वाजता सुरू झाले तेव्हा विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कक्षात बसून टीव्हीवर विधानसभेचे कामकाज बघत होते. एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करायची आणि निधीवाटप, स्थगितीच्या मुद्यावरूनही सरकारला घेरायचे असे सकाळच्या मविआच्या बैठकीत ठरले होते. अजित पवार यांनी कामकाज सुरू होताच विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा उचलला. शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी आधी का केली नाही, यावरून मग गोऱ्हे यांच्या दालनात चलबिचल सुरू झाली. 

विधानसभेत भूखंडाचा मुद्दा, पण राजीनाम्याची मागणी नाही

  • सूत्रांनी सांगितले की, विधानसभेत सुरुवातीलाच अजित पवार यांनी शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी न केल्याबद्दल उद्धव ठाकरेंची नाराजी त्यांच्या गटातील नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कानावर घातली. 
  • मग काही वेळाने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नागपूरच्या भूखंडाचा विषय विधानसभेत उपस्थित केला, पण शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी मात्र केली नाही. त्यामुळे शिंदेंच्या राजीनाम्याच्या मागणीला एकप्रकारे खो मिळाला.
  • भुजबळ यांनी केलेल्या आरोपांवर आधी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले

काय घडले विधान परिषदेत?परिषदेचे कामकाज सुरू व्हायला एक तासाचा अवधी होता. ठाकरे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आदी विधान परिषद सदस्यांना बोलावून घेतले आणि परिषदेचे कामकाज सुरू होताच नागपूरच्या एनआयटी भूखंड वाटपावरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा सभागृह सुरू होताच रेटण्यास सांगितले. सभागृहात घडलेही तसेच. दानवे, खडसे यांनी या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. फडणवीस यांनी उत्तर दिले, पण त्याने विरोधकांचे समाधान झाले नाही. गदारोळातच अनिल परब यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पण उपसभापतींनी त्यांना परवानगी दिली नाही. त्यावर परब यांनी नाराजी व्यक्त केली. 

गोऱ्हे यांनी ठेवले नियमांवर बोट गोऱ्हे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यानंतर गोऱ्हे त्यांच्या दालनात परतल्या. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी बसून होते. लगोलग अनिल परबदेखील आले. आम्ही विषय आणखी ताणून धरला असता, आम्हाला बोलायचे होते पण बोलू दिले गेले नाही, अशी नाराजी परब यांनी उद्धव यांच्यासमक्षच बोलून दाखविली. गोऱ्हे यांनी मग नियमांवर बोट ठेवले. 

त्या म्हणाल्या, मी विरोधी पक्षाच्या सदस्यांना व्यवस्थित बोलू दिले. त्यांनी सरकारची कोंडीही केली. मला नियमानुसार कामकाज चालवावे लागते. माहितीच्या मुद्यावर एकदा मंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर सदस्यांना नियमानुसार बोलता येत नाही. तुम्हाला हाच विषय पुन्हा मांडण्याची गुरुवारच्या विरोधी पक्षांच्या प्रस्तावावेळी संधी असेल तेव्हा तुम्ही बोला, इतर आयुधेही तुम्ही वापरू शकता, असे परब यांना त्या म्हणाल्या. त्यावर मग उद्धव यांनी हस्तक्षेप करत विषय मिटविला, असे सूत्रांनी सांगितले. असा वाद झाल्याचा गोऱ्हे यांनी मात्र, ‘लोकमत’शी बोलताना इन्कार केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे