शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

श्रम प्रतिष्ठा दिवस; श्रमावरून विषमता, कशी मिळेल प्रतिष्ठा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 10:29 IST

अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते.

ठळक मुद्देश्रमिकांकडे पाहण्याची मानसिकता बदलाअधिकाराचा वापरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते. यापैकीच एक म्हणजे श्रम विषमता होय. प्रत्येक व्यक्ती कळत न कळतपणे ही विषमता जोपासते, पाळते. आपल्यापेक्षा कमी दर्जाचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण कमी लेखतो. तेथूनच ही विषमता सुरु होते. तेव्हा ज्या देशात श्रमालाच प्रतिष्ठा नसेल तिथे श्रमिकांची काय परिस्थिती असेल? म्हणून श्रमिकांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे.देशात तब्बल ९३ टक्के श्रमिक हे असंघटित आहेत. किंवा असंघटित क्षेत्रातील आहेत. केवळ ७ टक्के श्रमिक हे संघटित आहेत. असंघटित असलेले ९३ टक्के श्रमिक हे नवनिर्माणाचे काम करतात. उदाहरणार्थ बांधकाम क्षेत्रातील कामगार हे नवीन इमारती उभारतात. विणकर धाग्यापासून कापड तयार करतो, शेतकरी बियापासून धान्य निर्माण करतो. कारखान्यात काम करणारे मजूरही नवीन निर्माण करीत असतात. त्यामुळे देशाच्या विकासात यांचे महत्त्वाचे योगदान आहे. इतकेच नव्हे तर घरकाम करणारी मोलकरीणीचीही सुद्धा महत्वाची भूमिका आहे. कारण घरकाम करणारी मोलकरीण आहे म्हणून नोकरदार आपले काम व्यवस्थितपणे करू शकतात. एक दिवस मोलकरीण आली नाही, तर कामावर जायला उशीर होतो, असा अनुभव आहे. एकूण देश घडवण्यात या ९३ टक्के असंघिटत श्रमिकांचाही मोलाचा वाटा आहे. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात त्यांच्या श्रमाला कुठलेही स्थान नाही. त्यांच्यासाठी वेज बोर्ड नाही. किमान वेतन आहे परंतु कंत्राटदार पद्धतीत ते वेतनही त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची दैनावस्था झाली आहे.यातच मोलकरीणपासून तर ड्रायव्हरपर्यंत आणि मजुरापासून तर शेतकºयांपर्यंतच्या श्रमिकांकडे समाजाची पाहण्याची दृष्टीही विषमता वाढवणारी आहे. अशा श्रमिकांसोबत साधारणपणे आपली वागणूक तुच्छपणाची असते. न कळतपणे आपण त्यांना कमी लेखत असतो. या श्रमिकांच्या श्रमाकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांनी प्रतिष्ठेने पाहिले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना संविधानिक अधिकार बहाल केले आहे. परंतु आपली त्यांच्याकडे पाहण्याची ही दृष्टी बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्या श्रमाला व त्यांना खºया अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही.

महिलांच्या श्रमाकडे सर्वाधिक दुर्लक्षअसंघटित क्षेत्रातील सर्वच श्रमिक तसे पीडित आहेत. परंतु यातही महिला श्रमिकांवर सर्वाधिक अन्याय होत असतो. त्यांना मजुरी पुरुषांपेक्षा कमी दिली जाते. घरी राहणारी महिला ही दिवसभर राबत असते. परंतु तिच्या कामालाही प्रतिष्ठा नाही. तिच्या कामाला कर्तव्य असल्याचे सांगून तिच्या श्रमाकडेही समाज दुर्लक्ष करतो, ही सुद्धा विषमताच असून समाजाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.-विलास भोंगाडे, कामगार नेते

टॅग्स :Socialसामाजिक