शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

श्रम प्रतिष्ठा दिवस; श्रमावरून विषमता, कशी मिळेल प्रतिष्ठा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 10:29 IST

अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते.

ठळक मुद्देश्रमिकांकडे पाहण्याची मानसिकता बदलाअधिकाराचा वापरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते. यापैकीच एक म्हणजे श्रम विषमता होय. प्रत्येक व्यक्ती कळत न कळतपणे ही विषमता जोपासते, पाळते. आपल्यापेक्षा कमी दर्जाचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण कमी लेखतो. तेथूनच ही विषमता सुरु होते. तेव्हा ज्या देशात श्रमालाच प्रतिष्ठा नसेल तिथे श्रमिकांची काय परिस्थिती असेल? म्हणून श्रमिकांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे.देशात तब्बल ९३ टक्के श्रमिक हे असंघटित आहेत. किंवा असंघटित क्षेत्रातील आहेत. केवळ ७ टक्के श्रमिक हे संघटित आहेत. असंघटित असलेले ९३ टक्के श्रमिक हे नवनिर्माणाचे काम करतात. उदाहरणार्थ बांधकाम क्षेत्रातील कामगार हे नवीन इमारती उभारतात. विणकर धाग्यापासून कापड तयार करतो, शेतकरी बियापासून धान्य निर्माण करतो. कारखान्यात काम करणारे मजूरही नवीन निर्माण करीत असतात. त्यामुळे देशाच्या विकासात यांचे महत्त्वाचे योगदान आहे. इतकेच नव्हे तर घरकाम करणारी मोलकरीणीचीही सुद्धा महत्वाची भूमिका आहे. कारण घरकाम करणारी मोलकरीण आहे म्हणून नोकरदार आपले काम व्यवस्थितपणे करू शकतात. एक दिवस मोलकरीण आली नाही, तर कामावर जायला उशीर होतो, असा अनुभव आहे. एकूण देश घडवण्यात या ९३ टक्के असंघिटत श्रमिकांचाही मोलाचा वाटा आहे. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात त्यांच्या श्रमाला कुठलेही स्थान नाही. त्यांच्यासाठी वेज बोर्ड नाही. किमान वेतन आहे परंतु कंत्राटदार पद्धतीत ते वेतनही त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची दैनावस्था झाली आहे.यातच मोलकरीणपासून तर ड्रायव्हरपर्यंत आणि मजुरापासून तर शेतकºयांपर्यंतच्या श्रमिकांकडे समाजाची पाहण्याची दृष्टीही विषमता वाढवणारी आहे. अशा श्रमिकांसोबत साधारणपणे आपली वागणूक तुच्छपणाची असते. न कळतपणे आपण त्यांना कमी लेखत असतो. या श्रमिकांच्या श्रमाकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांनी प्रतिष्ठेने पाहिले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना संविधानिक अधिकार बहाल केले आहे. परंतु आपली त्यांच्याकडे पाहण्याची ही दृष्टी बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्या श्रमाला व त्यांना खºया अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही.

महिलांच्या श्रमाकडे सर्वाधिक दुर्लक्षअसंघटित क्षेत्रातील सर्वच श्रमिक तसे पीडित आहेत. परंतु यातही महिला श्रमिकांवर सर्वाधिक अन्याय होत असतो. त्यांना मजुरी पुरुषांपेक्षा कमी दिली जाते. घरी राहणारी महिला ही दिवसभर राबत असते. परंतु तिच्या कामालाही प्रतिष्ठा नाही. तिच्या कामाला कर्तव्य असल्याचे सांगून तिच्या श्रमाकडेही समाज दुर्लक्ष करतो, ही सुद्धा विषमताच असून समाजाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.-विलास भोंगाडे, कामगार नेते

टॅग्स :Socialसामाजिक