शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील खावटी फाईलमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST

मंगेश व्यवहारे नागपूर : लॉकडाऊनच्या काळात कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला होता. ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला होता. आदिवासी कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून आदिवासी विकास विभागाने खावटी देण्याचा निर्णय घेतला होता. हळूहळू सर्व क्षेत्र सरकारने अनलॉक केले. बंद पडलेल्या यंत्रणा सुरू झाल्या. पण अजूनही आदिवासी कुटुंबियांना खावटी उपलब्ध झाली नाही. एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष लागत असेल, तर त्याचा फायदा काय? असा सवाल आदिवासी समाजाने केला आहे.

१ मे रोजी आदिवासी विकासमंत्र्यांनी खावटी देण्याची घोषणा केली. ९ सप्टेंबर रोजी त्यासंदर्भात शासननिर्णय निर्गमित झाला. खावटी अनुदान योजनेंतर्गत आदिवासी कुटुंबांना ४ हजार रुपये अनुदान वर्षभरासाठी देण्यात येणार होते. यात २ हजार रुपये रोख व २ हजार रुपये वस्तूंच्या रूपात मिळणार होते. त्यासाठी ४८६ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली होती. नंतर सरकारने वस्तू स्वरूपात मदत न देता संपूर्ण खावटीची रक्कम रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. सरकारने लॉकडाऊन उठविला. १० महिने कोरोना संकटाचे झाले. नवीन वर्ष उजाडले. पण खावटी योजनेची अंमलबजावणी झाली नाही. खावटीचा लाभ देण्यासाठी कुटुंबांचा सर्व्हे केला. अजूनही सर्व्हेचे अपडेट नाही. खऱ्याअर्थाने आदिवासी बांधवांना जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगाराअभावी मदतीची खूप गरज होती. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे हातउसने व कर्ज घेऊन त्यांनी आपली गरज भागविली.

आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे

आदिवासी विकास विभाग हा आदिवासींसाठी काम करतो. त्यामुळे विभागाकडे आदिवासींचा तालुका व विभागानिहाय डाटा असायला पाहिजे. त्यामुळे सर्वेक्षणालाच ६ महिने लागले. अजूनही याद्या फायनल नाहीत. त्या निवड समितीपुढे ठेवायच्या आहेत. त्यानंतरही पुढची प्रक्रिया लांब आहे. आदिवासींचा डाटाच उपलब्ध नसेल, तर कुठल्या आधारावर योजना राबविण्यात येतात, हाच प्रश्न आहे. हे सर्व तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार आहे.

-दिनेश शेराम, अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद नागपूर

सध्या आमचे अपडेटशनचे काम सुरू आहे.

सध्या आमचे अपडेटशनचे काम सुरू आहे. अनेक कुटुंबांकडे आवश्यक दाखले नसल्याने शिबिर घेतले आहे. यादी फायनल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात येईल. नंतर आदिवासी आयुक्त कार्यालयाला यादी जाईल. त्यानंतर योजनेचे वाटप होईल, अशी माहिती अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून मिळाली.