शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनी-वायू प्रदूषणामुळे मेंदूला इजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST

नागपूर : मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम ...

नागपूर : मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम होतो. रस्ते अपघातामुळे मेंदूला दुखापत होऊन जीव जाण्याची धोकाही असतो. या सर्व गोष्टी टाळल्या जाऊ शकतात व मेंदूला निरोगी ठेवले जाऊ शकते, असे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘डब्ल्यूएफएन’च्या ‘ट्रॉपिकल अ‍ँड जिओग्राफीकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी व इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने मेंदू आरोग्य दिनानिमित्त आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. जेएमके मूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी मुंबईचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ.सरोश कत्रक म्हणाले, शरीरातील प्रत्येक अवयव संचालित करण्याचे काम मेंदू करतोच, शिवाय, भाषा, संवाद, स्मृती, व्यक्तिमत्त्व, कल्पक विचार, भावनांचे नियंत्रणदेखील मेंदूद्वारे केले जाते. चेन्नई ‘आयएएन’चे सचिव डॉ. यू. मीनाक्षीसुंदरम् म्हणाल्या, मेंदू हा पाॅवर स्टेशन आहे. तेथून करंट निघाला, तर शरीर संचालित होते. डोकेदुखी, स्ट्रोक, एपिलिप्सी असे अनेक मेंदूशी संबंधित आजार असून, त्यावर उपचार करण्याचे काम न्यूरोलॉजिस्ट करतो. हैदराबादचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. सुभाष कौल म्हणाले, मेंदूला बाह्य कारणांसोबत मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, थायरॉइड या अंतर्गत समस्यांमुळेदेखील मेंदूला दुखापत होऊ शकते.

- दोन जेवणाच्या वेळांमध्ये आठ तासांचे अंतर हवे

राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, आपण जेव्हा जेव्हा खातो तेव्हा मेंदूतून इन्सुलिन प्रसवते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यातून शरीरात फॅट्स वाढतात. दोन जेवणाची वेळांमध्ये किमान ८ ते ९ तासांचे, तर उपवासाच्या वेळांमध्ये किमान १५ ते १६ तासांचे अंतर असले पाहिजे. परंतु, हे करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

-दुपारी १२ नंतर कॉफी, सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे म्हणाले, झोप मेंदूसाठी फार आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी दुपारी १२ नंतर कॉफी आणि सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये. झोपताना विचार करू नये. चांगली झोप यावी, यासाठी वातावरण निर्मिती करावी, असेही ते म्हणाले.