शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

इन्फोसिसचे कार्यालय पाहिले आणि जीवनाचे ध्येय ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 03:08 IST

अमरावतीला इंजिनिअरिंग झाल्यावर आमचे कुटुंब पुण्याला स्थलांतरित झाले. अभियंता झाल्यावरही जीवनाचे ध्येय ठरले नव्हते.

नागपूर : अमरावतीला इंजिनिअरिंग झाल्यावर आमचे कुटुंब पुण्याला स्थलांतरित झाले. अभियंता झाल्यावरही जीवनाचे ध्येय ठरले नव्हते. काही जॉब करावा म्हणून एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब मिळविला. या कंपनीजवळ इन्फोसिसचे आॅफिस होते. एकदा कंपनीतून बाहेर निघताना इन्फोसिसची बिल्डींग दृष्टीस पडली आणि मी वेडावलो. आपली स्वत:ची अशीच बिल्डींग असावी हे स्वप्न मला दिवसा पडायला लागले. या बिल्डींगमुळे माझ्या आयुष्याचे ध्येय ठरले.प्रयास-सेवांकूर संस्थेतर्फे चिटणवीस सेंटर येथे ‘अलग राह’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण उद्योजक मंगेश वानखेडे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांनी मुलाखत घेतली. याप्रसंगी वानखेडे यांनी बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. आईवडिल शेतमजुरीचे काम करायचे. लहानपणापासूनच अठरा विश्वे दारिद्र्य जवळून अनुभवले. अशात घरच्यांचा विरोध बाजूला ठेवून वडील सैन्यात भरती झाले. वडिलांची पोस्टींग अलाहाबादला झाल्याने आम्ही तेथे गेलो. तेथेच पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. मात्र वर्षभरात वडिलांची आसामला पोस्टींग झाल्याने परत अमरावतीला आलो. येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. काही समजत नव्हते. मात्र काही शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास सुकर झाला. पुढे दहावी, बारावी आणि अभियांत्रिकीचे शिक्षण अमरावतीलाच झाले. त्यानंतर आमचे कुटुंब पुण्याला राहायला गेलो. मंगेश वानखेडे म्हणाले, आयटीचा विद्यार्थी म्हणून मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी मिळाली. तब्बल १९ महिने काम केल्यावर मात्र कामावरून मन उडाले. काय करतो, असे वाटायचे. आपार्किंग समस्येवर संशोधनसद्यस्थितीत सर्वच शहरे पार्किंग समस्येने बेजार आहेत. त्यामुळे शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी संशोधन करायचे हे आम्ही ठरविले. दोन वर्षात संशोधन करून एक टेक्निक तयार केले. २२०० चौरस फुट जागेवर १०० च्या वर गाड्या पार्क करण्याचे हे तंत्र होते. भारत सरकारकडून त्याचे पेटंटही घेतले आहे. मात्र अनेक महिने या संशोधनाकडे कुणी लक्ष दिले नाही. मोठे अधिकारी आणि नेत्यांनाही भेटलो मात्र कुणी दखल घेतली नाही. आपल्या देशात युवकांनी संशोधन करावे, असे भाषणात बोलले जाते. प्रत्यक्षात संशोधनाला प्रोत्साहन दिले जात नाही. अशातच केंद्रात मंत्री असताना शशी थरुर यांनी मदत केली आणि केरळमध्ये कंपनीसाठी जागाही दिली. मात्र आम्ही अपयशी ठरलो.यश-अपयशाच्या चौकटीतून बाहेर निघणे गरजेचेअपयशाने खचलो नाही. प्रयत्न सुरूच ठेवले. आज आम्ही सुरू केलेल्या स्काउट्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने चार कंपन्या आहेत. पार्किंगच्या समस्येच्या जाणिवेमुळे अनेकांना या प्रकल्पाचे महत्त्व कळले आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रकल्पाच्या प्रेझेंटेशनसाठी बोलविले आहे. नागपूर शहरासाठीही हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू असल्याचे मंगेश वानखेडे यांनी सांगितले. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत म्हणून स्काउट्स अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजची स्थापना केली. शेतकऱ्यांचे धान्य दलालाशिवाय सैन्य दलात पोहचेल, याचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच पुण्यात मॅरेथॉन घेणार असून यामध्ये बॉलिवूडचा आघाडीचा नायक सलमान खान व अन्य स्टार्स येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी यश आणि अपयशाच्या चौकटीतून बाहेर निघून मोठा विचार करावा. कारण विचार कराल तरच सत्यात उतरेल, असा कानमंत्र यावेळी मंगेश वानखेडे यांनी दिला.णि एक दिवस मित्रासोबत चांगल्या पगाराची नोकरी सोडली. घरच्यांना मनस्ताप झाला. मात्र ध्येय गाठण्यासाठी हे आवश्यक होते. स्वत:चा उद्योग स्थापन करावा हा एकच विचार मनात होता, मात्र काय करावे हे सुचत नव्हते. अनेक महिने खाली राहिल्याने पैसेही संपले होते. मात्र आता नोकरी करायची नाही हा विचार पक्का होता. भविष्यात गरज पडेल, असे काही करायचे होते. या काळात पैशांची समस्या सोडविण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कामे केली. (प्रतिनिधी)