शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद स्मारकातील माहिती केंद्र कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST

युवा दिवस विशेष नागपूर : १२ जानेवारी हा युवा दिन, अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती. नागपूर मनपाने सुमारे ३ ...

युवा दिवस विशेष

नागपूर : १२ जानेवारी हा युवा दिन, अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती. नागपूर मनपाने सुमारे ३ कोटी रुपये खर्चून स्वामीजींचे विशाल स्मारक बनवले आहे. युवा दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचे विचार ऐकण्यासाठी १० रुपयांचे तिकीट काढून अंबाझरी तलाव परिसरातील स्मारकात दाखल झालो. पण, केंद्राजवळचे दोन्ही गेट बंद होते. ते नेहमीच बंद असल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले. विनंतीवरून त्याने गेटचे कुलूप उघडले. आतील भिंतीवर स्वामीजींच्या प्रतिमा आणि एलसीडी स्क्रीन होता. याच माध्यमातून स्वामीजींचे विचार ऐकण्याची योजना होती, मात्र दोन वर्षांपासून ते बंद आहे.

स्वामीजी म्हणायचे, काम करण्याची प्रतिज्ञा घ्याल तेव्हाच ते पूर्ण करा, अन्यथा लोकांचा विश्वास उडून जातो. मनपाने स्वामीजींचे विशाल स्मारक बनविण्याची योजना आखली, मात्र, ती पूर्णत्वास नेली नाही, त्यामुळे मनपानेच आता स्वामीजींची ती शिकवण आठविण्याची गरज आहे. मंगळवारी स्वामीजींची जयंती असतानाही कुणालाही या स्मारकाची आठवण येऊ नये, हे आश्चर्य आहे.

ही होणार होती सुविधा

स्वामी विवेकानंदांचे विचार हिंदी आणि इंग्रजी भाषेतून युवकांना आणि नागरिकांना हेडफोन लावून ऐकता यावे, यासाठी सुविधा होणार होती. टच स्क्रीनचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. असे १४ स्क्रीन येथे लावण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांपासून ते बंद आहेत. आजही शेकडोंच्या संख्येने युवक येथे येतात, मात्र, त्यांना निराश होऊन परतावे लागते. येथील स्वच्छतेची जबाबदारी कंत्राटदाराकडे असली तरी नहरात साचलेले शेवाळ, जागोजागी फुटलेल्या टाईल्स, अस्वच्छता या बाबी नजरेत खुपण्यासारख्या आहेत.

...

यासंदर्भात जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला. कंत्राटदार नाना गोरमारे म्हणाले, सप्टेंबर-२०२० मध्ये त्यांना फक्त स्मारक परिसराची जबाबदारी सोपविण्यात आली. माहिती केंद्रातील स्क्रीन आणि ऑडिओ सिस्टीममध्ये तांत्रिक दोष असल्याने ती जबाबदारी नव्हती. नव्या महापौरांनी लवकरच केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे कंत्राटदाराने सांगितले. माहिती केंद्र गार्डन विभागाकडे असल्याचे कळल्याने विभागाचे सुप्रिंटेंडेंट अमोल चोरपगार यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, स्मारक परिसराची उभारणी मनपाच्या प्रकल्प विभागाने केली होती. आपल्याकडे फक्त सौंदर्यीकरणाचे काम होते. पाच लाख रुपयांचा खर्च करून ते पूर्ण केले. अखेर प्रोजेक्ट विभाग आणि इलेक्ट्रिक विभागाकडे विचारणा केली. लॉकडाऊनमुळे हे केंद्र सुरू केले नसून, लवकरच सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.