शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पीक पंचनाम्यांबाबत शासनाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:50 IST

यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देकापणीनंतर आला आदेश : महसूल विभागापुढे पेच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वरातीमागून घोडे चालविण्याच्या या प्रकाराने संबंधित यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या सर्व्हेक्षणाचा शेतकºयांना लाभ होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.यावर्षी खरीप हंगामात धानासोबत कापसावरही मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षेपेक्षा बरेच कमी उत्पन्न होत आहे. याबाबत स्थानिक आमदारांसह खासदारांनीही पीकांचे पंचनामे, सर्व्हेक्षण करण्याची विनंती शासनाकडे केली होती. पण प्रत्यक्षात वरिष्ठांकडून निर्देश आल्याशिवाय जिल्हास्तरावर प्रशासनाने हालचाल केली नाही. दि.५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पीक बाधित शेतकºयांना मदत देण्यासाठी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांना पाठविल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी ८ डिसेंबरला सर्व तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. या पंचनाम्यांमध्ये ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान असणाºया शेतकºयांना मदतीस पात्र ठरविले जाणार आहे. मात्र आता शेतात पिकच नाही तर पंचनामे काय करणार? असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.