शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मध संकलन योजना खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा जोडधंदा करावा, त्यातून उत्पन्न घेऊन आपले जीवनमान सुधारावे यासाठी मधुमक्षिका पालनासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा जोडधंदा करावा, त्यातून उत्पन्न घेऊन आपले जीवनमान सुधारावे यासाठी मधुमक्षिका पालनासाठी सरकारची योजना आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरात या योजनेसाठी छदामही मिळाला नाही. परिणामत: प्रत्येक जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योग कार्यालयाकडे लाभार्थ्यांचे अर्ज येऊनही ही योजनाच यंदा कार्यान्वित झाली नाही.

जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी मधुमक्षिका पालनाची योजना राबविली जाते. त्यासाठी लाभार्थ्याकडून अर्ज मागवून या योजनेसाठी निवड केली जाते. प्रगतिशील मधपाळ, वैयक्तिक मधपाळ आणि विशेष छंद प्रशिक्षक असे तीन गट करून मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी महाबळेश्वरला २० दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना ५० पेट्या घेणे बंधनकारक असते. दोन लाख ५६ हजार रुपयाचे हे साहित्य असले तरी यावर ५० टक्के अनुदान असते. वैयक्तिक मधपाळ योजनेसाठी १० दिवसाचे प्रशिक्षण जिल्हास्तरावरच होते. या लाभार्थ्यांना १० पेट्या घेणे बंधनकारक असते. ५८ हजार ६६ रुपयाचा खर्च असून, ५० टक्के अनुदान मिळते. विशेष छंद प्रशिक्षणासाठी पाच दिवसाचे प्रशिक्षण स्थानिक स्तरावर देऊन किमान दोन पेट्या घेणे बंधनकारक असते.

पूर्वीच्या योजनेचे नाव बदलून मध केंद्र मधमाशी पालन या नावाने मागील वर्षीपासून ही योजना राज्यात राबविली जात आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात निधी आला होता. मात्र कोरोनामुळे तो खर्च न झाल्याने बहुतेक जिल्ह्यातृून निधी परत करावा लागला होता. यंदा तर फेब्रुवारी महिना अर्धा होऊनही या योजनेचा निधीच आला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड समिती गठित असून, निधीच नसल्याने अद्याप लाभार्थ्यांचीही निवड झालेली नाही. त्यामुळे ऐनवेळी निधी आला तरी त्याची विल्हेवाट लावताना योजनेचीच वाट लागण्याची शक्यता अधिक आहे.

...

कसा मिळणार प्रतिसाद?

प्रगतिशील मधपाळ गटासाठी ५० पेट्या घेण्याची अट आहे. त्याची किंमत २ लाख ५६ हजार ६९२ रुपये असून, ५० टक्के अनुदान दिले जाते. मात्र ही ५० टक्के रक्कम लाभार्थ्यांनी प्रशिक्षण सुरू होण्याआधी भरावी, त्यानंतर प्रशिक्षण व मधपेट्या देण्याची अट आहे. दुसरे म्हणजे २० दिवसाच्या या प्रशिक्षणासाठी महाबळेश्वरला जावे लागते. त्यामुळे इच्छा असूनही अनेक शेतकरी हिंमत करीत नाहीत. यंदा तर कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक क्षमता खालावली आहे.

...

कोट

गेल्या आठवड्यात १ कोटी ५० लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. बांद्रा कार्यालयातून तो मुंबईच्या कार्यालयात येईल, त्यानंतर महाबळेश्वर कार्यालयातून राज्यभर वितरित केला जाईल. आमचे नियोजन झाले आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या आत हा निधी खर्च करून प्रशिक्षण सुरू केले जाईल.

- दिग्विजय पाटील, मधसंचालक, महाबळेश्वर